uttarakhand

उत्तराखंड : ध्येयवेड्या... `त्या` दोन जोड्या!

उत्तराखंडच्या आपत्तीमध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं इथं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि हवाईदलाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता ‘फिल्ड’वर उतरलेत.

Jun 26, 2013, 02:37 PM IST

केदारनाथमध्ये प्रलयानंतर रोगराईच संकट

केदारनाथमध्ये प्रलयानंतर आता रोगराईच संकट उभ ठाकलय, त्यामुळे केदारनाथमध्ये जवळपास २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रत्येकाचे डीएनए राखून ठेवण्यात आलेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय.

Jun 26, 2013, 01:47 PM IST

आज पुन्हा टीहरीमध्ये ढगफूटी, तीन ठार!

उत्तराखंडवर पुन्हा एकदा निसर्गानं आपली अवकृपा दाखवून दिलीय. पुरात सगळंच उद्ध्वस्त झाल्यानंतर आज ‘टेहरी’च्या देवप्रयाग भागात आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ढगफूटी झाली.

Jun 25, 2013, 05:10 PM IST

उत्तराखंड : ९,००० लोक अद्यापि बेपत्ता

उत्तराखंडामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. काल रात्रीपासून गुप्तकाशी परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसानं बचाव कार्यासमोर आव्हान निर्माण केलंय. जवळपास ९,००० लोक अद्यापी बेपत्ता आहेत. आतापर्यंत ८२२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेय.

Jun 25, 2013, 05:03 PM IST

प्रेतांचे अवयव कापून दागिने केले लंपास!

साधूंच्या रूपातील काही बदमाषांनी पाण्यात तरंगणाऱ्या नोटांवर डल्ला मारला होता. तर काही लुटारूंनी दागिने लुटण्यासाठी क्रुरपणे भाविकांच्या प्रेतांचे अवयवही कापले.

Jun 25, 2013, 04:59 PM IST

उत्तराखंडमध्ये महाराष्ट्राचा कॅम्प सुरू….

उत्तराखंडच्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या भाविकांच्या मदतीसाठी आणि त्यांना सुरक्षित राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं गोचरला कॅम्प सुरु केलाय. तर आजपासून जोशीमठला कॅम्प सुरू होणार आहे.

Jun 25, 2013, 12:16 PM IST

अखेर राहुल गांधीही उत्तराखंड दौऱ्यावर!

उत्तराखंड प्रकरणावरुन झालेल्या टीकेमुळे राहुल गांधी आजपासून उत्तराखंड राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या देहराडूनमध्ये असलेल्या नियंत्रण कक्षालाही भेट देतील

Jun 24, 2013, 06:31 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांची असंवेदनशीलता!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अत्यंत बेजबाबदारपणा पुण्यात दिसून आला. उत्तराखंडातील पुरात अडकलेल्या भाविकांच्या नातेवाइकांसोबत अत्यंत निष्ठुर वर्तन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.

Jun 24, 2013, 05:31 PM IST

उत्तराखंड : महाराष्ट्रातील हे ९० जण आहेत सुखरुप!

उत्तराखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना तिथून हलवण्यासाठी लष्कराचे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसांचे (आयटीबीपी) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Jun 24, 2013, 01:45 PM IST

उत्तराखंड : नवाजुद्दीनचं कुटुंबही अडकलं!

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या खूप काळजीत आहे कारण त्याचं कुटुंब उत्तराखंडच्या जलप्रलयात अडकलंय. नवाजुद्दीनचा त्याच्या कुटुंबाशी कसाबसा संपर्क झालाय मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी त्याला सतावतेय.

Jun 23, 2013, 10:31 AM IST

महाराष्ट्रातील शेकडो बेपत्ता, 30 हजार सुखरुप

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

Jun 22, 2013, 10:53 PM IST

अरे बापरे, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचावकार्य अधिक वेगानं सुरू करण्यात आलंय. केदारनाथ आणि गौरीकुंडच्या दरम्यान अडकून पडलेल्या १००० यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेय.

Jun 22, 2013, 07:16 PM IST

नेपाळी गुंडांकडून भाविकांवर अत्याचार आणि लूट

उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना नेपाळी गुंडांकडून हतबल भाविकांवर अत्याचार करण्यात येत असून मौल्यवान दागिन्यांची लूटही करण्यात आलेय.

Jun 21, 2013, 10:45 PM IST

राज्यातील धरणे धोकादायक, महापुराची भिती

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवला असेल... पण अशीच स्थिती आपल्या शहरात-गावात होऊ शकते, असं तुम्हाला सांगितलं तर..? राज्यातील धरणांची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असून त्यामुळे अनेक धरणं असुरक्षित बनली आहेत. झी २४ तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.

Jun 21, 2013, 09:46 PM IST

‘वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका’

उत्तराखंड राज्यात झालेली ढगफुटी आणि त्यानंत गंगा आणि यमुना कोपल्याने हजारो लोकांचा जीव गेला. तर हजारो लोक वाचले असले तरी ते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना मदत मिळत नाही. तसेच अन्न-पाण्यावाचून दिवस काढावे लागत असल्याने आम्हाला वाचवता येत नसेल तर बॉम्ब टाका आणि उडवून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांने व्यक्त केलेय.

Jun 21, 2013, 06:14 PM IST