चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे 'या' सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र..

Bollywood Celebs Who Skipped Honeymoon: बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही लोकप्रिय सेलिब्रेटींची. आपल्या चित्रपटांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांना लग्नानंतर आपला हनिमून पिरेएडही एन्जॉय करू शकले नाहीत... 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 1, 2023, 07:20 PM IST
चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे 'या' सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र.. title=
bollywood celebrities who didnt go for honeymoon read the full list

Bollywood Celebs Who Skipped Honeymoon:लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी नववर, नववधू हे सर्च करायला सुरूवात करतात. सध्या बॉलिवूडमध्येही लग्नाळू सेलिब्रेटींची चर्चा आहे. 24 सप्टेंबर रोजी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली होती. सध्या त्यांच्या या लग्नाची जोरात चर्चा रंगलेली असताना अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लग्नाचीही चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला माहितीये की लग्नानंतर हे सेलिब्रेटी कुठे जाणार याच्या हनिमूनचीही चर्चा रगंलेली असते. त्यासाठी लगेचच त्यांचे इन्टाग्राम अकाऊंट शेअर केले जातात. त्यांच्या फॉलोवर्समध्येही फार मोठी वाढ होताना दिसते. परंतु तुम्हाला माहितीये का काही सेलिब्रेटी मात्र आपल्या कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढूनही शकत नव्हते त्यामुळे त्यांनी हनिमून स्किप केल्याची चर्चा होती. आज आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत.

लग्नानंतर हनीमून जाण्याची प्रथा ही सर्वत्र रूजली आहे. त्यातून सध्या सेलिब्रेटींना आपल्या बिझी कामांच्या शेड्यूलमधून कुठे हलका वेळ काढणंही मुश्किल असते. त्यातून आपण पाहतो की अनेकदा सेलिब्रेटी हे आपल्या पार्टनरसोबत मस्त वेकेशन एन्जॉय करताना दिसतात. परंतु प्रत्येकवेळेला दिसत तसंच असतं अशातला भाग नाही. काहींना तर आपल्या कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून काही मोकळा वेळ मिळणंही शक्य होत नाही. सध्या आपण अशाच काही कपल्सविषयी जाणून घेणार आहोत. सुपरस्टार होणं हे काही सोप्पं नाही. त्यातून आपल्या पर्सनल आयुष्याला कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाईस करावे लागते. त्यातून कधी कोणतं काम येईल हेही सांगता येत नाही. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

या दोघांनी मागील वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले. त्यांना आता एक मुलगी पण आहे. परंतु कामाच्या बिझी शेड्यूलिंगमुळे त दोघं काही आपल्या लग्नानंतर हनिमूनला जाऊ शकले नाहीत. आतापर्यंत ते दोघंही आपल्या बिझी शेड्यूलमध्ये व्यस्त आहेत. 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा

24 सप्टेंबर रोजी या दोघांचाही विवाह पार पडला. यावेळी त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून सध्या त्यांच्या हनिमूनच्या प्लॅनबद्दल तशी काहीच चर्चा नाही. 

अथिया शेट्टी आणि के. एल. राहूल

या दोघांचेही यावर्षी थाटात लग्न झाले. त्यातून त्यांच्या हनिमूनचा प्लॅन हा रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात या दोघांनीही लग्न केले परंतु त्यांची जोरात चर्चा जरी रंगली असली तरी आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे ते दोघं हनिमूनला जाऊ शकले नव्हते. 

नताशा आणि वरूण धवल

या दोघांचेही हनिमून स्किप झाले होते. त्यांच्या लग्नाचीही बरीच चर्चा होती.