विराटने घेतला पराभवाचा बदला

वानखेडेच्या मैदानावार भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडीही मिळवली. 

Updated: Dec 12, 2016, 11:12 AM IST
विराटने घेतला पराभवाचा बदला title=

मुंबई : वानखेडेच्या मैदानावार भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडीही मिळवली. 

पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडविरुद्ध तीन सामने जिंकल्याने इंग्लंडने ही मालिका गमावलीये. तब्बल 8 वर्षांनी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकलीये. याआधी इंग्लंडने भारताला 2011, 2014, आणि 2015मध्ये हरवले होते. या पराभवाचा बदला कोहली अँड कंपनीने घेतला. 

2008मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध 1-0 असा विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी भारताने इंग्लंडला मालिकेत नमवलेय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने ही किमया साधलीये.