सरकारमध्ये 'गृह'कलह, खडसेंनी लिहिलं पत्र!

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन मंत्र्यांमध्ये नाराजी उमटलीय. नुकत्याच ४२ IAS अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्या केल्या. मात्र बदल्या करताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही म्हणून, मंत्र्यांमध्ये नाराजी पसरलीय. 

Updated: Jan 6, 2015, 12:16 PM IST
सरकारमध्ये 'गृह'कलह, खडसेंनी लिहिलं पत्र! title=

मुंबई: IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन मंत्र्यांमध्ये नाराजी उमटलीय. नुकत्याच ४२ IAS अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्या केल्या. मात्र बदल्या करताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही म्हणून, मंत्र्यांमध्ये नाराजी पसरलीय. 

याबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय. मात्र इतर मंत्र्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करणं टाळलंय. दरम्यान अनेक वर्षं मंत्र्यांकडे काम करत असललेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय, स्वतः फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर जाहीर केला होता. 

मग मुख्यमंत्री कार्यालयात जुनेच अधिकारी कसे, असा प्रश्नही काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.