ऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून

ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून चार विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह कांगारुंनी चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये २-० अशी आघाडी घेतलीय.

Updated: Dec 20, 2014, 02:39 PM IST
ऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून title=

ब्रिस्बेन : ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून चार विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह कांगारुंनी चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये २-० अशी आघाडी घेतलीय.

मिचेल जॉन्सन ऑस्ट्रेलियन टीमच्या विजयाचा शिल्पकार ठरला तर सेकंड इनिंगमध्ये भारताची बॅटिंग ढेपाळली आणि याचा सर्वाधिक फटका भारतीय टीमला बसला. भारतीय टीम दुसऱ्या इनिंगमध्ये २२४ रन्सवरच ऑल आऊट झाली. टीम इंडियानं कांगारुंसमोर अवघ्या १२८ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

हे आव्हान कांगारुंनी ६ विकेट्स गमावून पार केलं. बॉलर्सनी दुसऱ्या इनिंगमध्ये भेदक मारा केला. मात्र, स्कोअर्ड बोर्डवर डिफेंड करण्यासाठी रन्सचं कमी होत्या. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या टेस्टमध्ये पराभवचं तोंड पहाव लागलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.