आयपीएल महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी धावपळ

महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे आयपीएलच्या महाराष्ट्रातील मॅचेस राज्याबाहेर घ्यायचे आदेश हायकोर्टानं दिले  

Updated: Apr 22, 2016, 10:41 PM IST
आयपीएल महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी धावपळ title=

मुंबई: महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे आयपीएलच्या महाराष्ट्रातील मॅचेस राज्याबाहेर घ्यायचे आदेश हायकोर्टानं दिले. पण हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्यात आली आहे. 

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं सुप्रीम कोर्टामध्ये आयपीएल महाराष्ट्रातच घ्यावं, अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 25 एप्रिलला होणार आहे. 

वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मॅचसाठी आम्ही पिण्यायोग्य पाणी वापरत नाही, त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर मॅच खेळून द्यावा, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या याचिकेमध्ये मांडण्यात आलं आहे.