लंचपर्यंत भारत 1 बाद 173

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने भक्कम सुरुवात केलीये. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारताने एक बाद 173 धावसंख्या उभारलीये. 

Updated: Dec 18, 2016, 11:49 AM IST
लंचपर्यंत भारत 1 बाद 173 title=

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने भक्कम सुरुवात केलीये. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारताने एक बाद 173 धावसंख्या उभारलीये. 

सलामीवीर लोकेश राहुल शतकाच्या दिशेने वाटचाल करतोय. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव 477 धावांवर आटोपल्यानंतर भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि पार्थिव पटेल यांनी चांगली सुरुवात करत दिवसअखेर बिनबाद 60 धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. पार्थिव पटेल 71 धावांवर खेळत असताना इंग्लंडच्या मोईन अलीने त्याला बाद केले. मैदानावर पुजारा(11) आणि राहुल(89) धावांवर खेळतोय.