श्रीमंत महापालिकेचा गरीब कारभार

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प आहे 26 हजार 581.2 कोटी रुपयांचा आहे. हे बजेट कोणाच्याही डोळ्यात भरावं असंच आहे..कारण हा आकडाच तेव्हडा मोठा आहे...यंदाचं बजेट 23 हजार कोटी रुपयांचा आकडा पार करील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.. पण हे बजेट थेट 26 हजार 581.2 कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Updated: Mar 20, 2012, 11:07 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प आहे 26 हजार 581.2 कोटी रुपयांचा आहे. हे बजेट कोणाच्याही डोळ्यात भरावं असंच आहे..कारण हा आकडाच तेव्हडा मोठा आहे...यंदाचं बजेट 23 हजार कोटी रुपयांचा आकडा पार करील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.. पण हे बजेट थेट 26 हजार 581.2 कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचा बोजा महापालिकेच्या बजेटवर पडत आहे...मुंबईकरांना मुलभूत सेवा सुविधा पुरवितांना महापालिकेची दमछाक होत आहे..पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य अशा मुलभूत गरजांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे....विशेषत: झोपडपट्टी परिसरात मुलभूत सेवासुविधांचा प्रश्न आजही कायम आहे.. एकीकडं महापालिकेची जबाबदारी वाढत असतांना मात्र महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे..मालमत्ता कर, जकात कर , पाणी पट्टी यामाध्यमातून उत्पन्न वाढलं आहे...मुंबई महापालिकेचं वाढलेलं उत्पन्न आणि वाढती लोकसंख्या यामुळे महापालिकेचं बजेटही वाढलं आहे.

 

मुंबई महापालिकेच्या गेल्या सहा वर्षाच्या बजेटवर नजर टाकल्यास प्रत्येक वर्षी बजेटच्या आकड्यात वाढ झाल्याचं लक्षात येईल..

बीएमसीचं बजेट

वर्ष बजेट

2007 - 2008 - 12 हजार 877.52 कोटी रुपये

2008-2009 - 16 हजार 831.50 कोटी रुपये

2009- 2010 - 19 हजार 773 कोटी रुपये

2010 - 2011 - 20 हजार 417.31 कोटी रुपये

2011- 2012 - 21 हजार 96.56 कोटी रुपये

2012-2013 - 26 हजार 581.2 कोटी रुपये

 

यंदाच्या बजेटमध्ये मुलभूत गरजांवर भर देण्यात आला असून त्याच्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे....तसेच जुन्यात प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे....महापालिकेनं पाणीपट्टीत वाढ केल्यामुळं या मुद्द्यावरुन राजकारण होण्याची शक्यता असून विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला आहे....

 

मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि जकात वाढल्यामुळे मुंबई मनपाचं बजेट वाढलं..पण त्याबरोबर महापालिकेचा खर्चही वाढला आहे...कारण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच चालली आहे..यंदाचं बजेट आणि गेल्यावर्षीचं बजेट याची तुलना केल्यास जुन्या अपूर्ण योजना पूर्ण करण्यावरच या बजेटमध्ये भर दिल्याचं आढळून येईल.

 


महापालिकेच्या निवडणुकीत याच महापालिकेला सोन्याचं अंड देणारी को कोंबडी म्हणून संबोधण्यात आलं होतं..आणि त्यामुळे निवडणुक काळात चांगलचं राजकारण तापवलं होतं..आज मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून अर्थ संकल्पाचा आकडा पाहिल्यानंतर या महापालिकेच्या अर्थकारणाची बाजू किती भक्कम आणि वर्षागणिक कशी वाढत चाललीय याचा पुरता उलग़डा झाल्या शिवाय राहात नाही. महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी 2012 - 2013 साठीचा 26 हजार 581.2 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आणि त्यातून मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेल्या जबाबदा-या आणि निधी यांचे चित्र स्पष्ट झालं..

 

मुंबई महापालिकेचा 2011-12 सालचा अर्थसंकल्प हा 21 हजार 96 कोटी 56 लाखाचा होता. तर यंदाचा अर्थसंकल्प टक्क्यांनी वाढून तो 26 हजार 581.2 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला.

 

महापालिकेच्या वाढलेल्या तरतुदीमधला हा फरक महानगराची वाढती गरज स्पष्टपणे दर्शवतोय. महानगरपालिकेच्या मागील अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आलेल्या अनेक योजना प्रस्तावित स्वरुपात तर काही