एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली-मुख्यमंत्री

राज्यातील ४३ लाख खातेधारक शेतक-यांपैकी २२ लाख ४६ हजार खात्यांमध्ये कर्जमाफीची २० हजार ७३४ कोटी रूपये जमा झालेत

Updated: Dec 14, 2017, 11:34 PM IST
एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली-मुख्यमंत्री  title=

नागपूर : राज्यातील ४३ लाख खातेधारक शेतक-यांपैकी २२ लाख ४६ हजार खात्यांमध्ये कर्जमाफीची २० हजार ७३४ कोटी रूपये जमा झालेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला. उर्वरित शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी पुस्तीही त्यांनी कर्जमाफीवरच्या चर्चेला उत्तर देताना जोडली.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देण्यात आलेल्या कर्जमाफीचा फायदा अनेक बोगस शेतक-यांनी उचलला. त्यावेळी एका आमदारानं आणि त्याच्या कुटुंबातल्या ८ जणांनी कर्जमाफीचा लाभ घेतला, अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळेच यावेळी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले, असा खुलासा त्यांनी केला.