'या' लोकांनी कधीही खाऊ नये पपई, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान

पपई हे असे फळ आहे, जे भारतात खूप खाल्ले जाते आणि लोकांना ते फार आवडते, परंतु...

Updated: Apr 29, 2022, 09:43 PM IST
'या' लोकांनी कधीही खाऊ नये पपई, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान  title=

मुंबई : फळ खणं हे आरोग्यासाठी चांगले असल्याचे मानले जाते. परंतु असे असले तरी काही लोकांच्या आरोग्यासाठी सगळीच फळे चांगली. कारण लोकांना असे काही अशा प्रकारचे रोग असताता, ज्यामध्ये सगळ्याच प्रकारची फळं त्यांना चालत नाहीत आणि तरी देखील या लोकांनी ती फळं खाल्ली, तर त्यांच्या आरोग्यावर याचा निगेटीव्ह परिणाम होऊ शकतो. त्यांपैकी एक फळ आहे पपई.

पपई हे असे फळ आहे, जे भारतात खूप खाल्ले जाते आणि लोकांना ते फार आवडते, आरोग्य तज्ञ देखील त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात, परंतु जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर ते फायद्याऐवजी त्याचे नुकसान शरीरासाठी जास्त आहे.

तसेच विशिष्ट प्रकारच्या रोगाने ग्रस्त असलेल्यांनी या फळापासून अंतर ठेवावे. जरी पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात, परंतु तरीही हे फळ अनेक लोकांसाठी हानिकारक आहे, चला याबद्दल जाणून घेऊया.

या लोकांनी पपई खाऊ नये

1. किडनी स्टोनचे रुग्ण

पपई व्हिटॅमिन सीचा भरपूर स्त्रोत आहे. परंतु जेव्हा पोषक घटक कॅल्शियममध्ये मिसळते तेव्हा त्यापासून समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी हे फळ खाऊ नये.

2. या प्रकारची औषधे घेणारे लोक

जर तुम्ही रक्त पातळ करणारे औषध घेत असाल, तर आंबलेली पपई तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अनेकदा हृदयविकाराशी संबंधित लोक हे औषध घेतात, ज्यामुळे रक्ताभिसरणात कोणतीही अडचण येत नाही. परंतु अशा रुग्णांनी पपई खाल्ल्यास त्यांना गंभीर समस्या उद्भवू शकतात.

3. दम्याचे रुग्ण

जर तुम्हाला श्वासोच्छवासाची तक्रार असेल, तर पपईपासून अंतर ठेवा. या फळामध्ये असलेले एन्झाईम्स दमा रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतात.

4. गर्भवती महिला

अनेक आरोग्य तज्ञांच्या मते, गर्भवती महिलांनी पपई अजिबात खाऊ नये कारण ती त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

5. ऍलर्जी असलेले लोक

जर तुम्हाला ऍलर्जी सारखी समस्या भेडसावत असेल तर पपई अजिबात खाऊ नका, कारण त्यामध्ये असलेले पपईन घटक समस्या वाढवू शकतात आणि तुम्हाला त्वचेवर खाज किंवा जळजळ होऊ शकते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)