कपिलच्या शोमधून विना शुटिंग परतला अजय देवगण, म्हटला भेटल्यावर विचारेल की...

 अभिनेता अजय देवगणने मंगळवारी कपिलच्या शोच्या सेटवरून रागाने निघू गेल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 

Updated: Aug 30, 2017, 05:34 PM IST
कपिलच्या शोमधून विना शुटिंग परतला अजय देवगण,  म्हटला भेटल्यावर विचारेल की... title=

मुंबई :  अभिनेता अजय देवगणने मंगळवारी कपिलच्या शोच्या सेटवरून रागाने निघू गेल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. 

अजय म्हटला की, मला कपिलचा राग आला नाही. तसेच त्याच्या शोमध्ये जाणार नाही अशी शपथही घेतली नाही.  अजय देवगण आपल्या बादशाहोच्या संपूर्ण टीम सोबत कपिल शर्माच्या शोच्या सेटवर पोहचला. पण कपिल त्या ठिकाणी न आल्याने शुटिंग न करता संपूर्ण टीमला जावे लागले होते. कपिल संपूर्ण रात्रभर पार्टी करत होता, त्यामुळे सकाळी शुटिंगला येऊ शकला नाही. 

अजयने मान्य केले की गेल्या काही दिवसांपासून कपिलची तब्येत खराब आहे. त्यामुळे त्या हेच कारण होते का हे निश्चित नाही. राजधानीमध्ये मंगळवारी चित्रपटाच्या प्रचारासाठी अजय आला होता. त्यावेळी त्याने ही चर्चा मीडियामुळे झाली आहे. 

कपिल स्वतःला मोठा स्टार मानायला लागले आहेत. अजयला हे विचारले असता, तो म्हटला, मला नाही वाटत, यापूर्वीही असे शो रद्द झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत बिघडली आहे.  मला नाही माहिती काय झाले आहे. मी रागाने सेट सोडला नाही. कपिल त्या ठिकाणी पोहचला नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणाहून गेलो. त्याच्याशी बोलणे झाल्यावर मी याचे कारण विचारणार आहे.