draught

आता मुंबईकरांचं जेवण महागणार!

मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत.

May 22, 2013, 07:37 PM IST

शेतकऱ्यांसाठी शासनाचा वैरण विकास कार्यक्रम

दुष्काळी तालुक्यामध्ये चारा टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने वैरण विकास कार्यक्रमावर जोर दिला आहे. धुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मका, ज्वारी अशा वैविध्यपूर्ण वैरण पिकांचं बियाणं मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे चाऱ्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

Oct 23, 2012, 09:13 AM IST

'कोंडाण्या'बरोबर नागरिकही राहिले कोरडेच!

प्रकल्पाच्या मूळ किंमतीत भरमसाठ वाढ झाल्यानंतर कोंडाणे धरण प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय पण, त्यात स्थानिक मात्र नाहक भरडले जात आहेत.

May 18, 2012, 01:34 PM IST

कोंडाणे धरणाच्या कामावर हायकोर्टाचे ताशेरे

कोंडाणे धरणाच्या कामाबाबत उच्च न्यायालयानं सरकारवर कठोर ताशेरे ओढले आहेत. सरकारी खातं आणि ठेकेदारांमधील साटंलोटं यामुळे धरणाचा खर्च कोट्यवधी रुपयांनी वाढलाय. कोर्टानं सध्या कामाला स्थगिती दिलीय आणि पाच आठवड्यात प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत.

May 12, 2012, 10:38 PM IST

भंडारा: जिद्दीने दुष्काळाला पाजलं 'पाणी'

महाराष्ट्राचा अवघ्या ग्रामीण भागाची पाण्यासाठी वणवण सुरु असताना भंडारा जिल्ह्यातील बीड सीतेपार या गावानं मात्र दुष्काळाचा यशस्वी सामना केलाय.

May 9, 2012, 07:24 PM IST

दुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव

दुष्काळावरुन रान पेटलेलं असताना आणि सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच पतंगरावांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दुष्काळासाठी आम्ही कायमस्वरुपी काहीच करत नाही, चर्चा खूप होते पण प्रत्यक्षात आम्ही ठोस निर्णयच घेत नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री खुद्द पतंगराव कदमांनीच म्हटलंय.

May 5, 2012, 09:18 PM IST

दुष्काळाचं राजकारण

महाराष्ट्रातील आजवर पडलेल्या दुष्काळावर नजर टाकल्यास 1896 - 1897 या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे...त्यावेळी अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा झाला होता..1905-1906 या वर्षी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रेल्वेनं धान्य आणलं होतं...

May 3, 2012, 11:42 PM IST

सांगलीतील दुष्काळ जनावरांसाठी जीवघेणा

सांगली जिल्ह्यातला दुष्काळ आता जीवघेणा ठरू लागलाय. दूषित पाण्यामुळं पाच म्हशींचा मृत्यू झालाय. तर पाच जण अत्यावस्थ झालेत. त्यांच्यावर मिरजेतल्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

May 2, 2012, 05:58 PM IST

जळगावात पाणीटंचाई, बैठकीत खडाजंगी

राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीमुळं सरकारच्या तोंडचं पाणी पळालंय. जळगावात मात्र पाणीटंचाईबाबत अधिकारी सुस्त असल्याचं आढळून आलंय. याबाबत पाणीपुरवठा मंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत याचा प्रत्यय आला.

Apr 27, 2012, 04:49 PM IST

दुष्काळामुळे साताऱ्यात भीषण परिस्थिती

दुष्काळामुळे सातारा जिल्ह्यातल्या माण-खटावमधील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळं खरीप हंगाम वाया गेला. तर, परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं रब्बी हंगाम देखील हातचा गेला. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी जिद्दीनं डाळिंब, द्राक्षाच्या बागा फुलवल्या. मात्र आता पाण्याविना या बागाही जळू लागल्या आहेत.

Apr 22, 2012, 10:50 PM IST