Team India: विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर

Indian Cricket: विश्वचषक 2023आधी टीम इंडियासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार आहेत. 

Updated: Dec 10, 2022, 08:12 AM IST
Team India: विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर title=

Indian Cricket Team: पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असणार आहे. (Cricket News) या विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे संघाचा तणाव वाढला आहे. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे 2023 चा वर्ल्ड कप भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. मात्र, भारतीय खेळाडूंच्या दुखापतीची प्रक्रिया संपण्याचे नाव घेत नाही आहे. यावेळीही संघाचे 6 मोठे सामनाविजेते दुखापतीमुळे संघाबाहेर राहणार आहेत.

संघातील महत्त्वाचा खेळाडू जखमी 

टीम इंडिया सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातही भारतीय खेळाडू सतत दुखापतग्रस्त होत आहेत. संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणजेच कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. रोहित शर्मा याच्या अंगठ्याला दुखापत झाली असून, ही टीम इंडियासाठी सर्वात मोठी टेन्शन बनली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर तो बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही खेळू शकणार नाही.

हे तीन वेगवान गोलंदाजही टीम बाहेर

बांग्लादेश दौऱ्यात स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन यांनाही दुखापत झाली होती. कुलदीप सेन पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर आहे, तर दीपक चहरला हॅमस्ट्रिंगच्या तक्रारीमुळे मैदान सोडावे लागले. संघाचा वरिष्ठ तेज मोहम्मद शमी देखील खांद्याच्या दुखापतीमुळे या दौऱ्यावर टीममध्ये नाही.

हे दोन्ही खेळाडू फिट होणार का?

टीम इंडियाचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आशिया कप 2022 पासून टीमबाहेर आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तो बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग आहे. पण त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हाही पाठीच्या दुखापतग्रस्त आहे. तो दुखापतीतून सावरत आहे.

दरम्यान, भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात तिसरा आणि अखेरचा सामना चटगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियम खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून (IND vs BAN 3rd ODI) मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष लागले आहे.