T-20 वर्ल्डकप आधी रोहित शर्माने या खेळाडूवर दाखवला विश्वास, बॅटिंगसह बॉलिंग ही करणार

T-20 World Cup मध्ये हा ऑलराऊंडर कमाल करणार का?

Updated: Oct 9, 2021, 03:28 PM IST
T-20 वर्ल्डकप आधी रोहित शर्माने या खेळाडूवर दाखवला विश्वास, बॅटिंगसह बॉलिंग ही करणार title=

मुंबई : भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांना विश्वास होता की टीम इंडियाचा घातक अष्टपैलू हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये गोलंदाजी करेल पण तसे झाले नाही आणि आता भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने आशा व्यक्त केली आहे की हा खेळाडू टी-20 विश्वचषकात (T20 world cup) गोलंदाजी सुरू करेल.

हार्दिक पंड्याने (Hardik pandya)आयपीएलच्या यूएई लीगमध्ये पाच सामने खेळले. ज्यामध्ये त्याला फारसे यश मिळाले नाही. निवड समितीच्या अध्यक्षांच्या जाहीर घोषणेनंतर असे वाटत होते की तो गोलंदाजी करेल पण दरम्यान त्याने एकही ओव्हर टाकली नाही. आयपीएलमधील मुंबईच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "हार्दिकच्या गोलंदाजीवर फिजिओ आणि प्रशिक्षक काम करत आहेत. त्याने अजून एकही बॉल टाकलेला नाहीये. एकावेळी एक सामना लक्षात ठेवून आम्हाला त्याच्या फिटनेसचे आकलन करायचे होते. त्याच्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत तो गोलंदाजी सुरू करू शकेल.

पांड्याने फलंदाजीत निराशा केली आणि केवळ 127 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 14.11 आणि स्ट्राइक रेट 113.39 होती. रोहित म्हणाला, 'जोपर्यंत त्याच्या फलंदाजीचा प्रश्न आहे, तो थोडा निराश होईल पण तो एक महान खेळाडू आहे. तो यापूर्वी कठीण परिस्थितीतून बाहेर आला आहे तो त्याच्या फलंदाजीवर खूश होणार नाही पण संघाला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. मला स्वतः त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.'

खेळाडूंच्या खराब फॉर्मबद्दल काळजी करू नका

रोहितला मुंबई इंडियन्स संघातील भारतीय खेळाडूंच्या फॉर्मबद्दल चिंता वाटत नाही, कारण टी-20 विश्वचषक ही एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा असेल जिथे एखादा खेळाडू सरावाच्या वेळीही लयमध्ये परत येऊ शकतो. तो म्हणाला, 'आयपीएलमध्ये काय झाले आणि टी-20 विश्वचषकात काय होणार आहे यावर मी जास्त लक्ष केंद्रित करू इच्छित नाही. टी-20 विश्वचषक ही एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे आणि फ्रँचायझी क्रिकेट त्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही या पैलूंकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. फॉर्म महत्त्वाचा आहे पण दोन्ही ठिकाणी संघ वेगळे आहेत. म्हणूनच तुम्ही त्यावर जास्त लक्ष केंद्रित करू शकत नाही. रोहित व्यतिरिक्त हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन, राहुल चहर आणि मुंबईचा जसप्रीत बुमराह हे देखील टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग आहेत.