लंकेवर विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक

श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांचा पाठलाग करत १९ षटकात ५ गडी गमावत भारताने विजय मिळवला. विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्या खेळाच्या जोरावर भारताने विजय निश्चित केला.

Updated: Mar 1, 2016, 10:52 PM IST
लंकेवर विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक title=

मिरपूर : श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांचा पाठलाग करत १९ षटकात ५ गडी गमावत भारताने विजय मिळवला. विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्या खेळाच्या जोरावर भारताने विजय निश्चित केला.

सलग तिसऱ्या विजयानंतर भारताने अंतिम फेरी गाठली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. युवराज सिंगने १८ बॉलमध्ये ३५ तर विराट कोहलीने ४७ बॉलमध्ये नाबाद ५६ करत पुन्हा एकदा भारताला विजय मिळवून दिला.

भारताने सुरुवातीला 2 विकेट लवकर गमवले पण नंतर विराट कोहली, सुरेश रैना आणि युवराज सिंगने डाव सांभाळत महत्त्वाची कामगिरी बजावली. भारताकडून बुमरा, हार्दिक आणि अश्विन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स तर नेहराने १ विकट घेतली.