शरद पवारांची वाणी किती बदललीय?

प्रचारात मोदी सरकारवर सडकून टीका करणाऱ्या शरद पवारांची निकाल हाती आल्यावर वाणीच बदलून गेलीय. आधी भाजपला  बिनशर्त पाठींबा देऊ करणाऱ्या पवारांनी आता मोदी सरकारचं कौतुक करायला सुरूवात केलीय. 

Updated: Oct 26, 2014, 04:18 PM IST
शरद पवारांची वाणी किती बदललीय? title=

मुंबई : प्रचारात मोदी सरकारवर सडकून टीका करणाऱ्या शरद पवारांची निकाल हाती आल्यावर वाणीच बदलून गेलीय. आधी भाजपला  बिनशर्त पाठींबा देऊ करणाऱ्या पवारांनी आता मोदी सरकारचं कौतुक करायला सुरूवात केलीय. 

मोदी सरकार बरच काही करणार असं दिसतंय असं पवार म्हणतायत. या सरकारला काम कऱण्यासाठी वेळ दिला पाहीजे असं पवारांनी म्हटलंय.

केंद्रात काम करण्यासाठी जो संच असावा लागतो तो या सरकारमध्ये नाही मात्र या सरकारला थोडा संधीही दिली पाहीजे असं ते म्हणतात. नरेंद्र मोदी सरकारचे गोडवे गाऊन आता पवार कोणती खेळी खेळत आहेत याची उत्सुकता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.