रजा वाढविण्याबाबत उत्तर न आल्यानं मुन्नाभाई पुन्हा जेलमध्ये!

बेकायदा शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या संचित रजेचा (फर्लो)  १४ दिवसांचा कालावधी आज संपलाय. रजेत काही दिवसांची वाढ करावी अशी मागणी करणारा अर्ज संजयनं केला होता. मात्र त्यावर काही उत्तर न आल्यानं आपण सरेंडर करत असल्याचं संजय दत्त म्हणालाय. संजय दत्त आज दुपारी येरवडा जेलमध्ये परतलाय. जाण्यापूर्वी मीडियाशी बोलतांना त्यानं ही माहिती दिली. 

Updated: Jan 8, 2015, 01:58 PM IST
रजा वाढविण्याबाबत उत्तर न आल्यानं मुन्नाभाई पुन्हा जेलमध्ये! title=

मुंबई: बेकायदा शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या संचित रजेचा (फर्लो)  १४ दिवसांचा कालावधी आज संपलाय. रजेत काही दिवसांची वाढ करावी अशी मागणी करणारा अर्ज संजयनं केला होता. मात्र त्यावर काही उत्तर न आल्यानं आपण सरेंडर करत असल्याचं संजय दत्त म्हणालाय. संजय दत्त आज दुपारी येरवडा जेलमध्ये परतलाय. जाण्यापूर्वी मीडियाशी बोलतांना त्यानं ही माहिती दिली. 

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान अवैधरित्या शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आलं असून त्याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

कारागृहाच्या नियमाप्रमाणं प्रत्येक कैद्याला वर्षातून एकदा संचित रजा मिळते. २०१३ साली संजयला संचित रजा मिळाली होती. त्यानंतर २०१४ साली त्यानं पुन्हा रजेसाठी अर्ज केला. २४ डिसेंबर रोजी त्याची १४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र या रजेत आणखी काही दिवसांची वाढ करण्यात यावी असा अर्ज त्यानं केला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.