पाकच्या ना'पाक' कारवाया सुरूच, गोळीबारात काश्मीभरमध्ये 5 ठार

जम्मूतील तंगधार सेक्टर इथं भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना सुरक्षा दलांच्या जवानांशी चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. 

PTI | Updated: Oct 6, 2014, 09:05 AM IST
पाकच्या ना'पाक' कारवाया सुरूच, गोळीबारात काश्मीभरमध्ये 5 ठार title=

जम्मू: जम्मूतील तंगधार सेक्टर इथं भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना सुरक्षा दलांच्या जवानांशी चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. 

तसंच पाकिस्तानकडून सीमाभागात नापाक कारवाया सुरुच आहेत. काल रात्रभर पाकिस्तानकडून आरएस पुरा आणि अरनिया भागात फायरिंग करण्यात आली. या फायरिंगमध्ये ४ लोकांचा मृत्यू आणि २५ पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. गेल्या 5 दिवसांत पाककडून सीमाभागत तब्बल १० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. 

पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा रेषेवरील गावात राहणाऱ्या पाच नागरिकांचा मृत्यू, सुमारे २५ जण जखमी. 

दरम्यान, वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं हे पाकिस्तानसाठीच धोकादायक ठरु शकतं, असं भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.