विषारी कीटकनाशकांच्या पुरवठ्याला केंद्रीय कृषीमंत्रालय जबाबदार - पवार

घातक कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नयेत म्हणूनच कठोर कायदे करण्यात आले आहेत. जर अशी कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असतील तर याला केंद्रीय कृषी मंत्रालय जबाबदार आहे असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.  

Updated: Oct 23, 2017, 12:44 PM IST
विषारी कीटकनाशकांच्या पुरवठ्याला केंद्रीय कृषीमंत्रालय जबाबदार - पवार title=

मुंबई : घातक कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नयेत म्हणूनच कठोर कायदे करण्यात आले आहेत. जर अशी कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असतील तर याला केंद्रीय कृषी मंत्रालय जबाबदार आहे असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.  

दिल्लीत एक स्वतंत्र संस्था कीटकनाशक प्रमाणित करण्याचं काम करेत. अप्रामाणित कीटकनाशकं शेतक-यांपर्यंत पोहचत असतील तर याला 100 टक्के दोष केंद्रीय कृषीमंत्रालयाचाच आहे असंही पवार यांनी म्हटलंय. ते आज नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. 

गेल्या काही दिवसात विषारी कीटकनाशकांच्या फवारणीनंतर यवतवाळमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूच सत्र सुरू झालं. त्याचं लोण महाराष्ट्राच्या इतर भागातही पसरलं..आता याप्रकरणी पवारांनी केंद्राकडे बोट दाखवल्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.