कृपा करुन लॉकडाऊन पाळा, अन्यथा आर्थिक संकट - राज ठाकरे

'लॉकडाउनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहील.' 

Updated: Apr 4, 2020, 12:37 PM IST
कृपा करुन लॉकडाऊन पाळा, अन्यथा आर्थिक संकट - राज ठाकरे title=
संग्रहित छाया

मुंबई : लॉकडाउनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहील. तसेच लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल. कृपा करुन लॉकडाऊन पाळा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे केले आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी इतकी शांतता आपण १९९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नसल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदी यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते, तसे त्यांनी तसे काहीही केलेले नाही. मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय तपासणी बंद करायला हवी. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना  फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल करायला हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण अशा लोकांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाऊन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच, असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

 - हा लॉकडाऊन गांभिर्यानं घ्या, दिवस वाढवले गेले तर त्याचा परिणामही वाढत जाणार,आर्थिक संकट वाढत जाणार
- जे शिस्त पाळत नाहीत त्यांच्यामुळं अधिक काळजी वाढतंय. सध्या प्रत्येक घरात डॉक्टर झालेत, जे गोमूत्र प्या सारखे अनेक सल्ला देतायत
- जीव धोक्यात घालून सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा काम करत आहे. त्यांचे कौतुक आहे. त्यांना धन्यवाद दिले पाहिजे
- पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाबाबत काय करायला पाहिजे हे सांगण्याची गरज होती. लोकांच्या मनातील संभ्रमावस्था पंतप्रधानांनी संपवायला हवी होती. त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला आहे.
- ज्यांना दिवे, मेणबत्त्या पेटवायच्या आहेत ते पेटवतील.. मेणबत्या पेटवण्यापेक्षा त्यांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता
- असा प्रसंग पहिल्यांदाच आलाय. संपूर्ण जगावर असा प्रसंग एकाचवेळी आला आहे. त्यामुळे नेमके काय करायचे याबाबत भूमिका हवी.
- अमेरिकेत ३२ लाख लोकांनी बंदुका विकत घेतल्या
- पोलिसांवर हात टाकता ? मरकज प्रकरणातील लोकांना गोळ्या घालायला हव्यात
- इतकी शांतता आपण १९९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती.