गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रायगडवर शोककळा, तिघांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना घडली आणि मजरे जांभूळपाडा गावावर शोककळा पसरली.एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 

Updated: Aug 25, 2017, 09:12 PM IST
 title=

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना घडली आणि मजरे जांभूळपाडा गावावर शोककळा पसरली.एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 

पाली तालुक्यातील मजरे जांभूळपाडा गावात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. तारेवरील टॉवेल काढताना शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरलेय.

मृतांची नावे 

१. बाजीराव मालुसरे (६५) , 
२. सचिन मालुसरे (३३) 
३. निकिता दळवी (२३)