मोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? उद्धव ठाकरे यांनी उडवली देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली

कोण सूर्य? कसला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरू सूर्य असेल तो मणिपूरमध्ये का उगवत नाही, मणिपूरमध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? तिकडे जर उगवणार नसेल तर सूर्याचं करायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Updated: Jun 19, 2023, 08:45 PM IST
मोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? उद्धव ठाकरे यांनी उडवली देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली   title=

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis  : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात जोरदार वार प्रहार होत आहेत.  शिवसेनेच्या वर्धापन दिनी (shisvena anniversary) भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताना  भलताच दावा केला होता. मोदींनी लस तयार केली म्हणून 100 देश वाचले असा दावा फडणवीस यांनी केला होता. मोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कल्याणमधील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली. उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ओकारी. मोदींवर टीका करणे म्हणेज सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी भाषेत निशाणा साधला.  

कोण सूर्य?

कोण सूर्य? तुमचा सूर्य मणिपूरमध्ये उगवत नसेल तर त्याचा उपयोग काय? मणिपुरमध्ये लिबीया सारखी स्थिती झालेय. केंद्रीय मंत्र्यांच घर जाळलं तरी तिकडे कुणी जात नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी  देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अकोल्याच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा देखील गौरव केला.

मोदींनी लस तयार केल्याचा दावा हास्यास्पद

मोदींनी कोरोना लस तयार केली म्हणून 100 देश वाचले. मोदीजींनी लस तयार केली नसती तर काय अवस्था झाली असती. अमेरिका,रशियासमोर कटोरा घेऊन उभे रहावे लागले असते. आम्हाला लस, आम्हाला लस द्या. करोडो-करोडो लोक मरून गेले असते.  मात्र मोदींनी लस तयार केली आणि आज भारत उभा आहे, असे विधान देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मोदींनी लस तयार केल्याचा दावा हास्यास्पद असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली.