संजय लीला भन्साळींना सलमान आणि ऐश्वर्यालाच घेऊन करायचा होता 'बाजीराव मस्तानी'!

Salman Khan-Aishwaryra Rai in Bajirao Mastani : सलमान खान आणि ऐश्वर्या रायला घेऊन संजय लीला भन्साळी यांना करायचा होता 'बाजीराव मस्तानी'

दिक्षा पाटील | Updated: Feb 24, 2024, 09:00 AM IST
संजय लीला भन्साळींना सलमान आणि ऐश्वर्यालाच घेऊन करायचा होता 'बाजीराव मस्तानी'! title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan-Aishwaryra Rai in Bajirao Mastani : 2015 मध्ये प्रदर्शित झालेला 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट सगळ्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील दीपिका आणि रणबीर सिंगची केमिस्ट्रीनं प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर काशी बाईच्या भूमिकेत दिसलेली प्रियांका चोप्रा देखील सगळ्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण करून गेली होती. या तिन्ही कलाकारांना त्या भूमिकेत पाहून सगळ्यांना वाटलं की तेच कलाकार त्या भूमिकांसाठी बनलेले आहेत. पण तुम्हाला माहितीये का? या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या संजय लीला भन्साळी यांची या चित्रपटासाठी असलेली पहिली पसंती ही ऐश्वर्या राय आणि सलमान खान होते. काही कारणामुळे त्यांची जोडी या चित्रपटात दिसली नाही. 

रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्यानं नकार दिल्यानं संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटासाठी सलमानसोबत करीना कपूरला कास्ट करण्याचा विचार केला होता. मात्र, त्या दोघांच्याही डेट मिळत नव्हत्या. संजय लीला भन्साळी यांना 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देवदास' या चित्रपटानंतर लगेच त्यांना 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट करायचा होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भन्साळी जवळपास 10 ते 12 वर्षे बाजीराव मस्तानीच्या शोधात होते. मात्र, त्यांना कोणी मिळालं नाही. अखेर 2015 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

1999 मध्ये संजय लीली भन्साळी यांनी 'हम दिल दे चुके सनम' मध्ये सलमान आणि ऐश्वर्याला कास्ट केलं होतं. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर त्यांच्यात असलेली केमिस्ट्री पाहता संजय लीला भन्साळी यांनी 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट त्या दोघांसोबत करण्याचा निर्णय घेतला होता. खरंतर जेव्हा संजय लीला भन्साळी यांनी 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट करण्याचा विचार केला होता. तेव्हा सलमान आणि ऐश्वर्याचं नातं तुटलं होतं. त्यांच्या नात्यात इतका दुरावा आला होता की त्यानंतर ते दोघं कधी एकत्र दिसले ही नाही. असं म्हटलं जातं की ऐश्वर्यानं त्यानंतर एक घोषणा केली होती की ती परत कधीच सलमान खानसोबत काम करणार नाही. हेच कारण होतं की संजय लीला भन्साळी यांनी जेव्हा ऐश्वर्याकडे या चित्रपटासाठी विचारणा केली तेव्हा सलमानचं नाव कळताच तिनं चित्रपटाला नकार दिला होता. या चित्रपटासाठी जेव्हा ऐश्वर्यानं सलमानसोबत काम करण्यास नकार दिला होता, तेव्हा सलमाननं संजय लीला भन्साळी यांना कतरिना कैफला कास्ट करण्याचं सुचवलं होतं.