'मला भीती नाही, तो खूप...', किरण रावने सांगितलं आमिर खानसोबतच्या घटस्फोटाचं खरं कारण

Kiran Rao Statement On divorce : किरण रावचा लापता लेडीज हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. अशातच सिनेमाच्या यशानंतर बोलताना आमिर खानसोबतच्या (Aamir Khan) घटस्फोटाचं मोठं वक्तव्य केलंय.

सौरभ तळेकर | Updated: Apr 6, 2024, 08:44 PM IST
'मला भीती नाही, तो खूप...', किरण रावने सांगितलं आमिर खानसोबतच्या घटस्फोटाचं खरं कारण title=
kiran rao, divorce, aamir khan

Kiran Rao On Aamir Khan : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आणि दिग्दर्शिका किरण राव (Kiran Rao) यांचा 2021 मध्ये घटस्फोट झाला होता. किरण राव यांच्या लापता लेडीज या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाली होता. प्रेक्षकांनी सिनेमाला मोठी गर्दी देखील केली होती. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये हा सिनेमा तयार झाला. या सिनेमाच्या यशानंतर किरण रावने दिलेल्या मुलाखतीत आमिर खानसोबतच्या घटस्फोटाचं (Kiran Rao Aamir Khan divorce) कारण काय होतं? यावर मोठा खुलासा केला आहे. 

काय म्हटली किरण राव?

खरं सांगायचं तर मला घटस्फोटाची भीती वाटली नाही. मी त्याबद्दल माझा गोड वेळ घालवला.  त्यामुळे मला त्याची चिंता नव्हती. आमीर आणि मी खूप मानसिकदृष्ट्या स्ट्रॉग होतो. आम्ही एकमेकांशी खूप कनेक्टेड होतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, तेवढाच आदर देखील करतो. त्यामुळे आमच्यातील ती गोष्ट कधीही बदलेली नाही, म्हणून मला काळजी वाटली नाही, असं किरण राव म्हणाली. मला माहिती होतं की, मला माझी स्वत:ची स्पेस हवी असते. मला फ्री आयुष्य जगायला आवडतं. माझ्या डेव्लपमेंटसाठी ही स्पेस मला हवी होती. मी जेव्हा आमीरशी बोलले तेव्हा त्याने माझा निर्णय स्विकारला आणि मला समर्थन देखील दिलं, असा खुलासा किरण रावने केला आहे.

आम्ही एकमेकांची काळजी घेत नव्हतो, त्यामुळे आमच्यामध्ये कोणत्याही समस्या कधीच नव्हत्या, त्यामुळे मला घटस्फोटाची चिंता आणि भीती कधीच नव्हती, असं किरण राव म्हणते. लग्नाआधी आम्ही 1 वर्ष लव इन रिलेशनशीपमध्ये होतो. मात्र खरं सांगायचं तर आम्ही आमच्या घरच्यांमुळे पुढे पाहिलं. त्यावेळी आम्ही ठरवलं की आपण स्वतंत्रपणे आणि कपल म्हणून देखील एकत्र राहु, असं किरण राव म्हणते.

दरम्यान, मला वाटतं की तुम्ही लग्नाचा अर्थ ज्या पद्धतीने मांडता ते महत्त्वाचं असतं. कारण ते एका विशिष्ट उद्देशासाठी होतं आणि ही सामाजिक मान्यता अनेक लोकांसाठी आणि मुलांसाठी खरोखरच महत्त्वाची आहे, असंही किरण रावने म्हणलं आहे. लग्नामुळे तुम्हाला खूप छान गोष्टी मिळतात. यामुळे तुम्हाला एक आनंद मिळतो. नवीन कुटुंब, नातेसंबंध आणि सुरक्षितता आणि स्थिरतेची भावना असते, असंही ती म्हणते.