Marathi Drama News

गिरगाव व्हाया दादर....

अमोल भोर दिग्दर्शित गिरगांव व्हाया दादर या नाटकाचे नुकतेच २५ प्रयोग पूर्ण झाले. या नाटकातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधोरेखित करण्यात आला आहे आजच्या तरुणपिढीला आधुनिकीकरणाचं आकर्षण, 3D पिक्चर्स, रॉकिंग गाणं हेच त्यांचं आयुष्य.

Jan 3, 2012, 08:04 PM IST

शिवाजी पार्कवर अवतरली 'शिवशाही'

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिग्दर्शित 'जाणता राजा' हे महानाट्य पुन्हा एकदा बघण्याची संधी मुंबईकरांना मिळालीय.२० ते २५ डिसेंबरदरम्यान या महानाट्याचं आयोजन शिवाजी पार्कमध्ये करण्यात आलंय.

Dec 22, 2011, 08:14 AM IST

'अँक्शन' रिप्लेची 'अँक्शन'

पुरुष प्रधान संस्कृतीमुळे नवरा बायकोच्या नात्यात येणारे तणाव आणि त्यातून सर्व काही आलबेल करताना दोघांचीही होणारी कसरत हा विषय आहे संगीत अँक्शन रिप्ले या नाटकाचा. अमोल बावडेकर, विजय गोखले आणि गौरी पाटील यांच्या या नाटकाता प्रमुख भूमिका आहेत.

Dec 21, 2011, 10:52 AM IST

संगीत मानापमान नाटक पुन्हा रंगभूमीवर

बालगंधर्वांनी अजरामर केलेलं संगीत मानापमान हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय. शंभर वर्षांपूर्वी हे नाटक लिहिलं गेलं होतं. हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी राहुल देशपांडेंनी पुढाकार घेतलाय. येत्या अठरा तारखेला संगीत मानापमानचा पहिला प्रयोग पुण्यात होणार आहे.

Dec 16, 2011, 03:59 AM IST

श्रीकांत मोघे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष

भारतीय नाट्य संम्मेलन आणि वाद यांच जन्माजन्मतरींच नातं असलं पाहिजे असेच म्हंटलं पाहिजे. कारण की, आज अखिल भारतीय नाट्य सम्मेलनाच्या अध्यक्षांची वादविवादामध्येच निवडप्रकिया पूर्ण झाली. 92 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीकांत मोघे यांची निवड करण्यात आली.

Nov 28, 2011, 09:17 AM IST

रुईयाचा 'नाका म्हणे'

रुईया कॉलेजची अभिनयसंपन्न पंरपरा ज्या नाक्याने जवळून पाहिली तोच नाका आता बोलका होणार आहे. कारण याच कॉलेजच्या अमृतमहोत्सवा निमित्त 'नाका म्हणे' ही कलाकृती सादर होणार आहे. कॉलेजच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने या कॉलेजमधले सगळे रंगकर्मी एकत्र येऊन सादर करत आहेत.

Nov 26, 2011, 08:40 AM IST

'सुखांशी भांडतो आम्ही' आता हिंदी आणि गुजराथीत!

चिन्मय मांडलेकर आणि गिरीश ओक यांच्या दमदार अभिनयाने नटलेलं 'सुखांशी भांडतो आम्ही' हे नाटक आता लवकरच हिंदी आणि गुजराथी रंगभूमीवर दाखल होणार आहे. अभिनेता मनोज जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Nov 24, 2011, 12:50 PM IST

राजीव पाटील वळले रंगभूमीकडे

जोगवा' आणि 'पांगिरा' या दोन्ही नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमांमधून आपली दखल घ्यायला लावली ती दिग्दर्शक राजीव पाटीलनं. सिनेमांमध्ये व्यस्त असलेला राजीव आता रंगभूमीवर 'प्रियांका आणि दोन चोर' हे नवं नवं नाटक घेऊन येतोय.

Nov 22, 2011, 01:52 PM IST

भीषण राजकीय नाट्य- 'वार-करी'

राज्य सांस्कृतिक संचालनालय आणि विशेष समाज कल्याण अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत सध्याच्या राजकारणावर भाष्य करणारे सामाजिक आशयप्रधान ‘वार- करी’ हे नाटक बॉश फाईन आर्ट्सने सादर केले.

Nov 18, 2011, 11:54 AM IST

दिलीप प्रभावळकरांना गदिमा पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना अत्यंत मानाचा समजला जाणार ‘गदिमा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लालन सारंग यांना ‘गृहिणी सखी सचिव’ तर शिक्षणतज्ञ रावसाहेब कसबे यांना ‘स्नेहबंध’ आणि मोनिका गजेंद्रगडकर यांना ‘चैत्रबन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गदिमा प्रतिष्ठानचे आनंद माडगुळकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुण्यात १४ डिसेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Nov 17, 2011, 04:20 PM IST

चैतन्याचा झरा म्हणजे पु.ल.

मराठी साहित्यातला चैतन्याचा झरा म्हणजे पुल. संगीतातला आनंद यात्री म्हणजे पुलं. रंगभूमीवरचा परफॉर्मर म्हणजे पुलं. पुलंनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप प्रत्येक ठिकाणी पाडली अर्थात ही त्यांना त्यांच्या चाहत्यांनी पाडायला लावली.

Nov 8, 2011, 06:22 PM IST

रायगडाला जेव्हां जाग येते @ २३०१

श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हां जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाला सामाजिकतेची जोड दिल्यानेच २३00वा प्रयोगापर्यंत टप्पा गाठता आहे.ज्येष्ठ रंगकर्मी व नाटकात ‘शिवाजी’ची भूमिका साकारणारे अविनाश देशमुख यांनी व्यक्त केलं.

Nov 1, 2011, 03:51 PM IST

रत्नाकर मतकरींना विष्णुदास भावे गौरव पदक

यंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. राम जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Nov 1, 2011, 03:30 PM IST

नगरलाच रंगणार राज्य नाट्य स्पर्धा

अहमदनगर इथेच ९ नोव्हेंबरपासून राज्य नाट्यस्पर्धा रंगणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कमी प्रवेशिका प्राप्त झाल्याचे कारण देत नगरच्या राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र रद्द केलं होतं.

Oct 26, 2011, 02:28 PM IST

नेहरु सेंटरमध्ये नाट्यमहोत्सव

' पुनश्च हनिमून ', ' प्रिया बावरी', ' तिची १७ प्रकरणे ' या गाजलेल्या मराठी नाटकांसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतील दर्जेदार नाटकांचा महोत्सव येत्या१९ ते २६ सप्टेंबर याकालावधीत वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये होत आहे . सेंटरच्या सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे यंदा १५वे वर्ष आहे .

Oct 20, 2011, 03:02 PM IST

‘रणांगण’ पुन्हा रंगभूमीवर!

पानिपत युद्धाचं यंदाचं २५०वं वर्ष आहे. या निमित्तानं पुण्यातल्या युवा रंगकर्मींनी रणांगण पुन्हा एकदा रंगमंचावर आणायचं ठरवलंय. दिग्पाल लांजेकर या नाट्यकमीर्नं ही धुरा उचलली असून नव्यानं रंगमंचावर येत असलेल्या 'रणांगण'चं तो दिग्दर्शन करतो आहे.

Oct 20, 2011, 09:26 AM IST

रौप्यमहोत्सवी 'अस्तित्व'

हौशी आणि नव्या दमाच्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ज्या स्पर्धा मुंबईत होतात, एक महत्त्वाची स्पर्धा म्हणजे 'कल्पना एक आविष्कार अनेक'. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यात नाट्यक्षेत्रातले दिग्गज एक संकल्पना सुचवतात.

Oct 11, 2011, 05:20 AM IST

...आणि थिएटर फुटलं!

प्रयोगाला पुन्हा सुरूवात झाली. प्रयोग सुरू होऊन काही मिनिटं झाली असतील, तर सेलफोन पुन्हा वाजला. काही कळायच्या आत, थिएटरमधला एक रसिक ताडकन जागेवरून उठला आणि ओरडला, 'अरे ए.. कुणाचा फोन आहे.. त्याला बाहेर काढा आधी..'

Sep 23, 2011, 11:32 AM IST