vidarbh

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान

नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Feb 25, 2014, 12:25 PM IST

वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

वेगळ्या विदर्भाच्या मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Feb 22, 2014, 07:24 PM IST

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पूराची परिस्थिती कायम

चंद्रपूर जिल्ह्यात पूराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पूरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Aug 3, 2013, 07:08 PM IST

विदर्भात ओला दुष्काळ जाहीर होणार?

विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.

Jul 29, 2013, 09:25 AM IST

मंत्र्यांचा ‘पूरग्रस्त’ विदर्भ दौरा!

विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला.

Jul 28, 2013, 11:54 AM IST

धरणं उघडली, रस्ते पाण्यात, संपर्क तुटला!

गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घातलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.

Jul 17, 2013, 02:16 PM IST

संपूर्ण विदर्भात पावसाची दमदार हजेरी

नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसानं कालपासून दमदार हजेरी लावलीय. नागपुरात रात्रभरात 72 मिमी पावसाची नोंद झालीय. भंडारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार सुरू आहे.

Jun 25, 2013, 10:54 PM IST

अब तक ४८!

आग ओकतोय सूर्य ! भाजून निघतेय कातडी ! जनता झालीय हैराण ! राज्यात उष्णतेची लाट !

May 24, 2013, 12:02 AM IST

विदर्भात पावसाचे २० बळी

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय. पावसामुळं २० जणांचा बळी गेलाय. विदर्भातल्या बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक धरणं भरून वाहू लागली आहेत.

Sep 6, 2012, 10:43 AM IST

विदर्भाला 500 कोटींचं अनुदान

शेवटी केंद्राला महाराष्ट्रातल्या विदर्भाची दया आलेली दिसतेय. विदर्भातील पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी 500 कोटी रुपयांचं अनुदान देण्यास मंजुरी दिलीय.

Jul 5, 2012, 01:26 PM IST

पावसाची महाराष्ट्रभर जोरदार हजेरी

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल हवामानामुळे पश्चिम किनारपट्टीवर वरुणराजा चांगलाच प्रसन्न झालेला दिसतोय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलीय. आज दिवसभर कोकणात काय दैना उडवलीय पावसानं... टाकूयात एक नजर...

Jul 3, 2012, 07:04 PM IST

विदर्भात पाण्यासाठी वणवण

वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय.

Apr 10, 2012, 01:11 PM IST

विदर्भातील राहुल रोहणे IFS

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुऱ्यातील राहुलनं रोहणे परिवारासह राजु-याचं नाव उंच केलयं. गरीब कुटूंबातील २४ वर्षीय राहुलनं कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय IFS चा गड सर केलाय. आपल्या कर्तृत्वानं त्यानं इच्छा तिथे मार्ग ही म्हण प्रत्यक्षात साकारली आहे.

Apr 7, 2012, 02:52 PM IST

शेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'

कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.

Dec 2, 2011, 02:37 PM IST