sharad pawar confused

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांना संभ्रम, यामागचं कारण...

राज्यातील सरकारबद्दलच्या शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारंवार बदलत्या भूमिकेमुळे सगळ्यांना कन्फ्युज केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू दिलं नाही. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच जेल भरो आंदोलनही केलं. मात्र आता शरद पवारांनी आपली भूमिका बदलली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शेतकऱ्यांची मानसिकता कारणीभूत असावी की व्यसनाधीनता असा प्रश्न आता शरद पवारांना पडलाय.

Sep 23, 2015, 09:39 PM IST