maratha kranti morcha

मराठा मोर्चेकऱ्यांकरता शिवसेनेने केली न्याहारीची सोय...

 ठाणे जिल्ह्यातून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. त्या मोर्चाला शिवसेनेची मदत पडद्यामागून होत होती. परंतु, आता शिवसेनेने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला थेट पाठींबा दाखवला आहे. मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी सकाळी सहा वाजल्यापासून पक्षातर्फे न्याहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर तब्बल ७० हजार मोर्चेकऱ्यांना पुरतील इतके वडापाव आणि चहाची करण्यात आली असून नवी मुंबईतील करावे येथील तांडेल मैदानावर ३५ हजार थाळी कांदेपोहे मागविण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जातीने या कामात लक्ष घालत आहेत. ठाणे महापालिकेतील काही वरिष्ठ  अधिकाऱ्यांनाही आवश्यक ‘रसद’ उभी करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.  

Aug 9, 2017, 10:48 AM IST

मराठा क्रांती मोर्चा मुंबई : आतापर्यंतच्या १० ठळक घडामोडी

मोर्चासाठी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व हायवेवरील टोल बंद करण्यात आला आहे.

Aug 9, 2017, 10:18 AM IST

मराठा मोर्चा : मुंबईला छावणीचे स्वरुप, आज मुंबई थांबणार

कोपर्डीतील पीडितेला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठ्यांचे वादळ काही वेळातच राजधानी मुंबईत धडकणार आहे. मोर्चासाठी राज्याचा कानाकोपऱ्यातून मराठा बांधव लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. रात्रीपासूनच मुंबईत मराठा बांधव दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मोर्चाचा परिणाम सुरू झाला असून, अनेक मार्गावरील वाहतूक संथ झाली आहे. 

Aug 9, 2017, 09:57 AM IST