bhaskar jadhav

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागरमधून माघार घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि कामगारमंमत्री भास्कर जाधवांना आव्हान देत निलेश राणेंनी गुहागरमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. 

Aug 21, 2014, 11:30 PM IST

भास्कर जाधवाविरोधात अपक्ष निवडणूक लढवू- नीलेश राणे

कोकणात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय. भास्कर जाधव यांच्याविरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार निलेश राणे यांनी केलाय. जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार निलेश राणे यांनी केलीय.

Aug 16, 2014, 07:20 PM IST

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार याचे संकेत आधीच देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. 

Jun 25, 2014, 02:29 PM IST

राष्ट्रवादीत फेरबदल, भास्कर जाधव यांची उचलबांगडी?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. लोकसभेतील दारूण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना राष्ट्रीवादीने बदल करण्याचे निश्चित केलेय. त्यासाठी विद्यमान भास्कर जाधव यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. नव्याने गृहमंत्री आर आर पाटील अथवा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची निवड अपेक्षा आहे. त्यांची नावे आघाडीवरआहेत.

Jun 18, 2014, 12:28 PM IST

राणेंना पाडणाऱ्या केसरकरांना राष्ट्रवादीचा पाठिंबा?

लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश न मानणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना पक्ष पाठिशी घालणार, असे संकेत दिसून आलेत.

May 29, 2014, 07:58 PM IST

भास्कर जाधवांचा तोल सुटला, हीना गावितांवर व्यक्तिगत टीका

हीना गावित या अविवाहित असल्यामुळे त्यांचे निर्णय वडील विजयकुमार गावित यांनीच घेतला असणार, असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलं आहे.

Mar 21, 2014, 06:22 PM IST

`एमआयडीसी` प्रकल्पातून जाधवांची जमीन कशी वाचली?`

निसर्गरम्य कोकण सध्या भकास करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न दिसतोय. कारण गुहागर-चिपळूण तालुक्याच्या मध्यावर्ती अर्थात मार्गताम्हाणे येथे येऊ घालेल्या एमआयाडीसी प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवायलाय.

Jan 18, 2014, 06:40 PM IST

तटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम

कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.

Jan 17, 2014, 07:57 AM IST

जाधव-तटकरे यांची कानउघडणी, पवारांचा समझोता यशस्वी

गेले अनेक महिने राष्ट्रवादीचे नेत भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील टकरे यांच्यातील शितयुद्ध टोकाला गेल्याने जाहीर थेट आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्य़ावर आला. उमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांनी समजावले होते. मात्र, वाद काही मिटेना. त्यामुळे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांना मध्यस्ती करावी लागली. त्यांनी दोघांची चांगलीच कानउघडनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

Dec 3, 2013, 05:41 PM IST

जाधव - तटकरे यांच्यातला संघर्ष शिगेला, पवारांचा हस्तक्षेप

कोकणातल्या राष्ट्रवादीचे २ दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. हे दोन नेते एकमेकांना पाण्यात पाहत असताना आता त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी पवारांना हस्तक्षेप करावा लागतोय.

Dec 3, 2013, 12:19 PM IST

जाधव vs तटकरे, राष्ट्रवादीच्या खेड कार्यालयाला ठोकले टाळे

माजी मंत्री आणि विद्यमान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यातील शीत युद्ध आता अधिकच चव्हाट्यावर आले आहे. भास्कर जाधव यांनी तटकरे समर्थक विद्यमान खेड तालुकाध्यक्षांची उचलबांगडी केल्याने वादत अधिक भर पडली. त्याचवेळी तटकरे समर्थक कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

Nov 23, 2013, 02:46 PM IST

भास्कर जाधवांचा माणिकरावांवर प्रतिहल्ला

जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय. तर माणिकराव नैराश्यातून बोलत असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय.

Jul 4, 2013, 06:33 PM IST

भास्कर जाधव ओसाड गावाचा पाटील – रामदास कदम

शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. भास्कर जाधव हे ओसाड गावाचे पाटील आहे. शिवसेना हीच भास्कर जाधावांची ओळख आहे. त्यांना कितीही मोठे केले तरी पुढे कोण विचारणारे नाही, असे मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

Jun 20, 2013, 10:12 PM IST