विधानसभा २०१४

जेव्हा कोकणचा ‘ढाण्या वाघ’ हरला!

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला तो सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये… नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. राणेंच्या पराभवाची नेमकी कारणं काय पाहूया. 

Oct 26, 2014, 09:27 PM IST

मोदी मॅजिक... विदर्भात काँग्रेस आऊट!

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसचं या निवडणुकीत पूर्णपणे पानिपत झालंय. भाजपनं यंदा दुप्पटीपेक्षा जास्त जिंकल्यात...

Oct 21, 2014, 06:57 PM IST

अखेर, शिवसेनेची ४८ वर्षांची प्रतिक्षा संपली!

कोकण... शिवसेनेचा बालेकिल्ला... पण, या बालेकिल्ल्यात रत्नागिरी विधानसभेच्या जागेवरून सेनेचा पहिला आमदार निवडून जाण्यासाठी शिवसेनेच्या स्थापनेपासून (१९६६) आत्तापर्यंत प्रतीक्षा करावी लागलीय. 

Oct 21, 2014, 06:28 PM IST

शिवसेनेचा प्रस्ताव भाजपनं फेटाळला

राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपकडून बहुमताची जुळवाजुळव सुरू झालीय. शिवसेनेकडून भाजपला गेलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळला आहे. 

Oct 20, 2014, 10:35 PM IST

भाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा डॉन!

राजकारणाच्या गुन्हेगारीबद्दल सातत्यानं ओरड करणाऱ्या भाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा एकेकाळचा मकोका डॉन संतोष आंबेकर सहभागी झाला होता. रविवारी मतमोजणी झाल्यानंतर पक्षाच्या नाव नियुक्त आमदारांच्या विजय

Oct 20, 2014, 08:57 PM IST

भाजप-सेनेच्या नगरसेवकांची दिवाळी, नऊ नगरसेवक आमदार!

विधानसभा निवडणूक अनेक अर्थानं ऐतिहासिक ठरलीये. ही निवडणूक जशी बहुरंगी, प्रस्थापितांना धक्के देणारी ठरली तशीच नव्याना संधी देणारीही होती. नाशिकमध्ये चार नगरसेवक आमदार झालेत. तर मुंबईतलेही पाच नगरसेवक आता विधानसभेत गेले आहेत.

Oct 20, 2014, 07:06 PM IST

एमआयएमच्या रुपाने कडव्या मुस्लिमवादाचा महाराष्ट्रात चंचू प्रवेश

हैदराबादः कट्टर 'एमआयएम' संघटनेच्या रुपाने महाराष्ट्रात कडवा मुस्लिमवादाचा चंचू प्रवेश झाला आहे.

Oct 20, 2014, 06:52 PM IST

मोदींच्या सभेनंतर १७ भाजप उमेदवार विजयी, १३ पराभूत

शिवसेना-भाजप महायुतीच्या ब्रेकअपपूर्वी महाराष्ट्रासाठी केवळ सहाच सभा पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं होतं. पण ‘महायुती’ फुटल्यानंतर त्यांनी राज्यात तब्बल २७ सभा घेत भाजपच्या जवळपास १७० उमेदवारांसाठी आपल्या पंतप्रधानपदाची सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती. 

Oct 20, 2014, 05:32 PM IST

भाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.

Oct 20, 2014, 04:26 PM IST