दहशतवाद्यांच्या निशान्यावर

मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशान्यावर

देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या निशान्यावर असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतातील प्रमुख शहरांवर हल्ले करु शकते. पण मुंबई ही त्यांच्या मुख्य निशान्यावर आहे. २६/११ हल्ल्यामागे असणाऱ्या या दहशतवादी संघटनेकडून मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी सुरु आहे. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर मुंबईतील सर्व मुख्य वास्तू आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

Oct 18, 2016, 05:17 PM IST

हायअलर्ट! भारतातील दोन ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशान्यावर

भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत आहे. समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातील दहशतवादी सोमनाथ आणि द्वारका येथे हल्ल्याचा कट रचत आहे. हाय अलर्ट नंतर सीमाभागावर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

Oct 6, 2016, 04:19 PM IST