T20 World Cup 2022 आधी या खेळाडूंना दिली जाणार सर्वाधिक संधी, ठरणार गेम चेंजर

टी-20 मालिकेत सर्वाधिक संधी मिळतील, कारण टी-20 विश्वचषकात त्यांची मोठी भूमिका असेल.

Updated: Feb 23, 2022, 10:04 PM IST
T20 World Cup 2022 आधी या खेळाडूंना दिली जाणार सर्वाधिक संधी, ठरणार गेम चेंजर title=

मुंबई : T20 विश्वचषक 2022 या वर्षाच्या अखेरीस खेळवला जाणार आहे. ज्याची घोषणा आयसीसीने केली आहे. विश्वचषक 2022 ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होणार असून अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. त्याआधी भारतीय संघ सतत टी-20 मालिका खेळत राहणार आहे. ज्याचा फायदा त्याला आगामी विश्वचषक 2022 मध्ये होऊ शकतो. (Team India Game changers player for T20 wprld cup 2022)

कोणत्या खेळाडूंना संघात घ्यायचे आणि कोणत्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवायचा याचा अंदाज भारतीय संघ व्यवस्थापनाला तोपर्यंत येईल. वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप दिल्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंका विरोधातही अशीच कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

भारतीय संघ या टी-20 मालिकेला विश्वचषकाचे आव्हान म्हणून घेत आहे. आगामी विश्वचषक 2022 ला फारसा वेळ उरलेला नाही. ज्यासाठी सर्व संघ परिश्रम घेत आहेत. विश्वचषक 2022 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये चांगल्या कामगिरीमुळे अनेक खेळाडूंचा संघात समावेश केला जाऊ शकतो. T20 विश्वचषकापूर्वी बीसीसीआय जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे.

विराट कोहली, ऋषभ पंत आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनसारख्या खेळाडूंना अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने 2022 च्या विश्वचषक स्पर्धेच्या रणनीतीवरही चर्चा सुरू केली असेल. इशान किशन, ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर आणि संजू सॅमसन या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

ऋतुराज गायकवाडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार खेळ दाखवला होता. दुसरीकडे श्रेयस अय्यरचाही मधल्या फळीत समावेश केला जाऊ शकतो. या खेळाडूने आपल्या फलंदाजीनेही खूप प्रभावित केले आहे.

भारतात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने खूप प्रभावित केले. ज्यांना संघ व्यवस्थापन T20 विश्वचषकाच्या प्लेइंग-11 चा भाग बनवू शकते. व्यंकटेश अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्ध 'फिनिशर'ची भूमिका उत्तम बजावली. त्याने गोलंदाजीत थोडी सुधारणा केली तर टी-20 विश्वचषकासाठी भारताकडे अष्टपैलू खेळाडू असेल. कारण हार्दिक पांड्याला संघात पुनरागमन करणे कठीण जात आहे. वेंकटेश अय्यरच्या जागी कोणाची निवड केली जाऊ शकते कारण त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध अत्यंत धडाकेबाज फलंदाजीचा नमुना सादर केला होता.

प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अलीकडेच सांगितले की, त्याचे आणि रोहितचे T20 विश्वचषकासाठी संघ संयोजनाबाबत स्पष्ट चित्र आहे. जे खेळाडू संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत, असे राहुल द्रविडने म्हटले होते. संघ व्यवस्थापनाला त्या खेळाडूंना घेऊन पुढे जायला आवडेल.