Ind Vs Sa : भारताची 19 वी ओव्हर रोहित शर्मासाठी का ठरतेय डोकेदुखी?

भारताचं 19 व्या ओव्हरचे टेंशन कधी संपणार? 

Updated: Oct 3, 2022, 09:12 AM IST
Ind Vs Sa : भारताची 19 वी ओव्हर रोहित शर्मासाठी का ठरतेय डोकेदुखी?  title=
(फोटो सौजन्य - AP)

Ind Vs Sa : 19व्या षटकाचे भारतीय संघाचे टेंशन संपण्याचे नाव घेत नाहीये. कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करताना 19 वे षटक महत्त्वाचे मानले जाते. बहुतेक वेळा हे षटक सामन्यात कोणत्या संघाच्या विजय होणार हे ठरवते. आशिया चषक 2022 पासून सुरू झालेल्या या समस्येचे उत्तर  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind Vs Sa) सुरू असलेल्या मालिकेतही भारताला मिळालेले नाही. गुवाहाटीमध्ये (guwahati) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान, अर्शदीप सिंगने (arshdeep singh) 19 वे षटक टाकले आणि दोन षटकार आणि दोन चौकारांसह एकूण 26 धावा दिल्या. यादरम्यान त्याने नो बॉलही टाकला. यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघासाठी 19वे षटक महागडं ठरलं आहे.

षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने (arshdeep singh) डेव्हिड मिलरला (david miller) नो बॉल टाकला, त्यावर मिलरने एक धाव घेतली. क्विंटन डी कॉकला (quinton de kock) दुसऱ्या फ्री हिट बॉलचा फायदा घेता आला नाही आणि त्याने एक रन घेऊन मिलरला स्ट्राइक परत दिला. तिसऱ्या चेंडूवर त्याने डीप मिड-विकेटच्या दिशेने षटकार ठोकला, तर चौथ्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चार धावा केल्या. मिलर इथेच थांबला नाही. त्याने पाचव्या चेंडूवर चौकार मारून शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. अर्शदीपने (arshdeep singh) या षटकात 26 धावा देत 4 षटकांमध्ये 62 धावा दिल्या. कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने टी-20 क्रिकेटमध्ये केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

मिलर आणि क्विंटन डी कॉकची ही दमदार खेळई 20 व्या षटकातही कायम राहिली. डावखुरा ऑफस्पिनर अक्षर पटेल ओव्हर टाकत होता. मिलरने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक सिक्स मारत शतक पूर्ण केले. हे त्याचे टी-20 कारकिर्दीतील दुसरे शतक होते. यानंतर क्विंटन डी कॉकने अक्षराच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून सामना संपवला. 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 3 गडी गमावून 221 धावाच करता आल्या. मिलरने नाबाद 106 आणि क्विंटन डी कॉकने नाबाद 69 धावा केल्या.

याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Ind Vs Sa) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारतीय संघाला 19वी ओव्हर महागात पडली होती. सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विकेट घेतल्या पण काही दिवसांपासून सुरू असलेली समस्या या सामन्यातही पाहायला मिळाली. डावातील 19वे षटकही येथे सर्वाधिक धावा काढणारे ठरले. संपूर्ण सामन्यात हे सर्वाधिक धावा देणारे षटक होते. अर्शदीपने (arshdeep singh) या षटकात 17 धावा दिल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यातही (IND vs AUS)या समस्येचा सामना करावा लागला होता. गेल्या काही सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने (bhuvneshwar kumar) ज्या प्रकारे डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली आहे ते स्वप्नवत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने खराब खेळी केली. ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) विजयासाठी शेवटच्या तीन षटकात 40 धावांची गरज होती. पण हर्षल पटेलने 18व्या षटकात 22 धावा दिल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दोन षटकांत 18 धावा करायच्या होत्या. 19 व्या षटकात भुवनेश्वर कुमारने (bhuvneshwar kumar) 15 धावा दिल्या. हे षटक संपल्याने सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाकडे झुकला होता.

टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी 19 वे षटक सर्वात महत्त्वाचे असते. हे षटक सामन्याची स्थिती आणि दिशा ठरवते. काही सामन्यांपासून भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) या षटकात अपयशी होत होता. आशिया चषकातही पाकिस्तानविरुद्ध (Ind VS Pak) 19व्या षटकात 19 धावा दिल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धही असेच काहीसे घडले. श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात 21 धावांची गरज होती आणि भुवीने 19 वे षटक टाकत 14 धावा दिल्या.