IND vs SA: सिरीज जिंकूनही टीमच्या खेळाडूंवर भडकला Rohit Sharma, म्हणाला...

हा सामना जिंकून टीमने दक्षिण आफ्रिकेला घरच्या टी20 मालिकेत प्रथमच पराभूत केलं

Updated: Oct 3, 2022, 08:41 AM IST
IND vs SA: सिरीज जिंकूनही टीमच्या खेळाडूंवर भडकला Rohit Sharma, म्हणाला... title=

Team India Beat South Africa: गुवाहाटीधील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळलेला सामना भारतासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला. हा सामना जिंकून टीमने दक्षिण आफ्रिकेला घरच्या टी20 मालिकेत प्रथमच पराभूत केलं. टीमच्या या ऐतिहासिक विजयानंतरही कर्णधार रोहित शर्माने खेळात आणखी सुधारणा करण्याबाबत विधान केलं. टीमकडून वारंवार होणाऱ्या चुकाही त्यांने सांगितल्या. 

मालिका जिंकल्यानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजांना आपल्या खेळात सुधारणा करण्यास सांगितलंय. आफ्रिकेने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 46 रन्स केल्यामुळे टीम इंडियाला जसप्रीत बुमराहची पुन्हा एकदा उणीव भासली. 

कालच्या सामन्यानंतर रोहित म्हणाला, "साहजिकच जसप्रीत बुमराहची दुखापत हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. शेवटच्या ओव्हर्स गोलंदाजी करण्यावर भर द्यावा लागेल. गेल्या पाच-सहा सामन्यांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केलेली नाही. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी करणं खूप अवघड असतं. कारण तिथेच सामन्याचा निर्णय होतो. हा एक पैलू आहे जिथे आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागतो."

सूर्यकुमार आणि विराटची तुफान खेळी

फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळी खेळली. मैदानावर येताच त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 22 बॉलमध्ये 61 रनची तुफानी खेळी केली.

विराट कोहलीनेही (Virat Kohli) आफ्रिकन गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. दोन्ही खेळाडूंमध्ये अवघ्या 42 चेंडूत 102 धावांची शतकी भागीदारी पाहायला मिळाली. युजर्स या जोडीचे भरभरून कौतुक करत आहेत. विराच कोहलीने 49 रनची खेळी केली.