Chanakya Niti:चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने 'या' लोकांशी कधीही वाद घालू नये, पश्चात्ताप होतो

आचार्य चाणक्य यांच्या नितीनुसार, व्यक्ती आयुष्यात अशा अनेक चुका करतो, ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक असते. जाणून घ्या कोणत्या 4 व्यक्तींशी वाद घालू नये.

Updated: Apr 4, 2022, 07:57 AM IST
Chanakya Niti:चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने 'या' लोकांशी कधीही वाद घालू नये, पश्चात्ताप होतो title=

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नितीनुसार, व्यक्ती आयुष्यात अशा अनेक चुका करतो, ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे व्यक्तीने सर्वांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक असते. जाणून घेऊया कोणत्या 4 व्यक्तींशी वाद घालू नये.

मूर्ख व्यक्ती - आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीशी कधीही वाद घालू नये. यामुळे वेळ वाया जातो. मूर्ख माणूस कोणाचेच ऐकत नाही. तो फक्त त्याचे शब्द बोलतो. त्यामुळे अशा व्यक्तीपासून अंतर राखले पाहिजे.

मित्र - प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र असतो ज्याला आपण आपले सर्व सुख-दु:ख सांगतो. आपली अनेक गुपितेही त्याला माहीत आहेत. म्हणूनच तुमच्या चांगल्या मित्राशी कधीही वाद घालू नका. कारण तो तुमच्याविरुद्ध गुप्त गोष्टी वापरू शकतो.

गुरु - गुरू आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देतात. गुरूशिवाय ज्ञानही मिळवता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही गुरूशी वाद घालू नका हे महत्त्वाचे आहे. याचा तुमच्या भविष्यावर वाईट परिणाम होतो.

प्रिय व्यक्ती - प्रिय व्यक्ती माणसाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणून, आपल्या प्रियजनांशी कधीही वाद घालू नका. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.