दुसरी वनडे : भारतानं वेस्ट इंडिजवर मिळवला 48 रन्सनं विजय

 भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा वन डे सामना आज दिल्ली येथे रंगतो आहे.

Updated: Oct 12, 2014, 08:45 AM IST

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 48 रन्सनं धुव्वा उडवलाय. पहिल्यांदा बॅटिंग करणा-या टीम इंडियाने विडींजपुढे 263 रन्सचं टार्गेट होतं.. मात्र सुरुवात चांगली करणा-या विडींज बॅटसमनला भारताचं हे आव्हान पेलवलं नाही.

एकामागून एक विडींजच्या सर्व बॅट्समन्सनी भारतीय बॉलर्सपुढे लोटांगण घातलं. विडींजची इनिंग अवघ्या 215 रन्समध्ये आटोपली. या विजयामुळं धोनी ब्रिगेडने पाच वनडेच्या सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.