भारत पुन्हा पाकिस्तानला हरवेल - गांगुली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पहिला मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. चार जूनला हा सामना रंगतोय. 

Updated: May 9, 2017, 06:19 PM IST
भारत पुन्हा पाकिस्तानला हरवेल - गांगुली title=

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पहिला मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. चार जूनला हा सामना रंगतोय. 

पाकिस्तानशी होणाऱ्या या सामन्यात भारत पुन्हा बाजी मारेल अशी आशा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केलीये. ५० तसेच २० षटकांच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड ११-० असा राहिलाय. पाकिस्तानला एकदाही भारताला हरवता आलेले नाहीये. 

तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध दोनदा जिंकलाय तर पाकिस्तानने एकदा भारताला हरवलेय. त्यामुळे यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधीलही सलामीच्या सामन्यात भारत पुन्हा पाकिस्तानला हरवेल असा विश्वास गांगुलीने व्यक्त केलाय.