मनसे कार्यकर्त्यांनी जाळला आसाराम बापूंचा पुतळा

आसाराम बापूंनी होळीतून केलेल्या पाण्याच्या नासाडीचे आता पडसाद उमटू लागलेत. मुंबईतल्या विलेपार्लेत मनसे कार्यकर्त्यांनी आसाराम बापूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.

Updated: Mar 19, 2013, 05:25 PM IST

www.24taas.com, मुंबई
आसाराम बापूंनी होळीतून केलेल्या पाण्याच्या नासाडीचे आता पडसाद उमटू लागलेत. मुंबईतल्या विलेपार्लेत मनसे कार्यकर्त्यांनी आसाराम बापूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. राज्यात दुष्काळ असताना आसाराम बापूंनी नागपूर आणि नवी मुंबईत होळीच्या माध्यमातून लाखो लिटर पाण्याची नासाडी केली होती.
बापूंच्या असंवेदनहिन कृतीचा निषेध करण्यासाठी विलेपार्लेतल्या सुभाषरोड नाक्यावर हे आंदोलन करण्यात आलं. आसरं बपूंच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेत मनसे कार्यकर्त्यांकडून आसारामबापूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन आज करण्यात आले.
विलेपार्ले पूर्व सुभाष रोड नाका याठीकाणी मनसे कार्यकर्त्यानी होळी आधीच आसाराम बापुंच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून होळी साजरी केली. नागपूर आणि नवी मुंबईमध्ये आसाराम बपूनी केलेल्या पाण्याच्या उधळपट्टीचा मनसे कडून निषेध करण्यात आला.