जिल्हा बँकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता

राज्यातील जिल्हा बँकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतीत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 14, 2016, 08:35 AM IST
जिल्हा बँकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता title=

मुंबई : राज्यातील जिल्हा बँकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतीत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात नाबार्डने राज्यातील 31 जिल्हा बँकांमध्ये निरीक्षण पूर्ण करून एक अहवाल तयार केलाय. या बँकांमधील ठेवी, जमा झालेले पैसे, झालेले व्यवहार या सगळ्याची सखोल माहिती गोळा करण्यात आलीय. नाबार्डने हा अहवाल अर्थ मंत्रालयाला सादर केला आहे.

जिल्हा बँकेंना रोकड देऊन खात्यात पैसे टाकायला, काढायला परवानगी द्यावी दोन मागण्या राज्य सरकारने केल्या होत्या. नाबार्डच्या अहवालानंतर ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.