मुंबई-गोवा महामार्गावर अपघात... सहा ठार

रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालची रात्र अपघात रात्र ठरली. दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय. 

Updated: Apr 13, 2016, 08:29 AM IST
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात... सहा ठार title=

रायगड : रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालची रात्र अपघात रात्र ठरली. दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय. 

लोणेरेजवळच्या टेमपाले गावच्या हद्दीजवळ रात्री अडीच वाजता भरधाव मोटार सायकलस्वार एसटीवर जाऊन धडकले. तर दुसरी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. शंकर ढेरे आणि मारुती कचरे अशी मृतांची नावं आहेत. रस्त्यावरून खाली घसरलेल्या मोटरसायवरचे दोघे गंभीर जखमी आहेत.

तर आणखी एका अपघातात कोलाडजवळ तळवली गावाजवळ रात्री दीडच्या सुमारास एसटीनं समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. त्यात चार जण जागीच ठार झाले. सगळे जण माणगाव तालुक्यातल्या दहिवलीचे आहे. आशिष पिसाळ, वैभव शिंद, सुरेश तळवटकर, आणि संदेश दाबणे अशी या चौघांची नावं आहेत.