नक्षलवादी हल्ल्यात सहा पोलीस शहीद

झारखंडमध्ये काठीकुंड परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला चढवलाय. या हल्ल्यात पाकूरचे एसपी अमरजीत बलिहार यांच्यासह पाच पोलीस जवान शहीद झाले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 2, 2013, 07:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, काठीकुंड
झारखंडमध्ये काठीकुंड परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला चढवलाय. या हल्ल्यात पाकूरचे एसपी अमरजीत बलिहार यांच्यासह पाच पोलीस जवान शहीद झाले आहेत.
डीआयजींसोबत बैठक आटोपून परत येत असताना नक्षवाद्यांनी हल्ला चढवला. नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ओडीशा, छत्तीसगड, महाराष्ट्र बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी उच्छाद मांडला आहे.
तर सरकारनं नक्षलवाद्यांच्या संदर्भात सरकारनं ब्लू प्रिंट तयार न केल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप भाजपनं केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.