पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरूच, भारताकडून चोख प्रत्युत्तर

सीमाक्षेत्रात पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. शनिवारी रात्री जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याकडून BSFच्या चौक्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. 

Updated: Aug 24, 2014, 12:05 PM IST
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरूच, भारताकडून चोख प्रत्युत्तर title=

नवी दिल्ली: सीमाक्षेत्रात पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. शनिवारी रात्री जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याकडून BSFच्या चौक्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. 

जम्मू कश्मीरमधील विविध चौक्यांवर पाक सैन्याकडून शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून आज पहाटेपर्यंत गोळीबार सुरूच होता. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं. आर्निया, आर.एस. पुरा आणि अखनू सेक्टरमधील चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. 

दरम्यान पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर द्या, असे निर्देश राजनाथ सिंह यांनी BSFच्या जवानांना दिलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.