सलमानला लग्न नावाची जबाबदारी का नको?

सलमान खानला लग्नाच्या बेडीत अडकायचं नाहीय, त्याला आपल्या खासगी जीवनाविषयी विचारलेलं अजिबात आवडत नाही, तरीही पत्रकारांनी त्याला मूड पाहून व्हर्जिनिटीवरून छेडलंय.

Updated: Jan 9, 2014, 05:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सलमान खानला लग्नाच्या बेडीत अडकायचं नाहीय, त्याला आपल्या खासगी जीवनाविषयी विचारलेलं अजिबात आवडत नाही, तरीही पत्रकारांनी त्याला मूड पाहून व्हर्जिनिटीवरून छेडलंय.
आपल्याला लग्न नावाच्या जबाबदारीत अडकायचं नाही मला लग्नात रस नाही, असं सलमानने स्पष्टपणे सांगून टाकलं आहे.
मी कुणाच्याही आयुष्यात जाऊ इच्छीत नाही, माझ्या मागे कुणाला यायचं असेल तर यावं, मात्र माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा करू नयेत, मी जे काही ठरवतो, त्यावर मी नेहमीच ठाम असतो, असंही सलमान खानने स्पष्टपणे सांगितलं आहे.
आतापर्यंत मी एकटाच होतो आणि एकटंचं रहायला मला आवडायला लागलं आहे, कारण मी कुणालाही बांधिल नाही. आपल्या आयुष्यात अजून कोणीही नाही, तसेच लग्न करून स्थिरस्थावर व्हायची सध्या तरी आपली इच्छा नाही, असं सलमान खानने म्हटलं आहे.
सलमान खानचा वर्षाभरानंतर जय हो नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या चित्रपटांची चांगली कमाई व्हावी, निर्माते, वितरक आणि प्रदर्शकांची चांगली कमाई व्हावी, ही आपली इच्छा असल्याचंही सलमाने सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.