गाडी जाळली म्हणून कामबंद

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांच्या उच्छादाचा निषेध म्हणून महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं लेखणी बंद आंदोलन सुरू केलं आहे. दुपारी ३ वाजता निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Updated: May 3, 2012, 11:54 AM IST

www.24taas.com, जळगाव

 

जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांच्या उच्छादाचा निषेध म्हणून महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं लेखणी बंद आंदोलन सुरू केलं आहे. दुपारी ३ वाजता निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं जाणार आहे. काल रात्रीच्या सुमारास वाळू माफियांनी चाळीसगावच्या तहसीलदाराची गाडी जाळली होती. तहसीलदार गाडीत नसल्यानं बचावले असून गाडीचा ड्रायव्हर मात्र जखमी झाला आहे.

 

मेहूनबारे गावाजवळ गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो आहे. याचीच चौकशी करण्यासाठी सहा जणांचं पथक रात्रीच्या सुमारास गस्त घालण्यासाठी गेले असताना ही घटना घडली होती.