घर विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका; मुख्यमंत्र्यांचं गिरणी कामगारांना आवाहन

'शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही'

Updated: Mar 1, 2020, 02:19 PM IST
घर विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका; मुख्यमंत्र्यांचं गिरणी कामगारांना आवाहन  title=
फाईल फोटो

मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठीची सोडत रविवारी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाली. एकही गिरणीकामगार बेघर ठेवणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गिरणी कामगारांना दिलं. तसंच एकही घर विकू नका असं वचनही त्यांनी गिरणी कामगारांकडे मागितलं. घर विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका असं ते यावेळी म्हणाले. तर शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन यावेळी आदित्य ठाकरेंनी दिलं. 

पुढील दोन चार वर्षात मुंबईत ५० हजार परवडणारी घर बांधणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखा निर्णय घेण्यास मोकळीक देणारा दुसरा मुख्यमंत्री नाही असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुकही केलं.

म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठीची सोडत आहे. म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे तसंच पर्यावरण मंत्री उपस्थित होते. बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांसाठी ही सोडत आहे. 

गिरणी कामगारांसाठीच्या घरांची आज सोडत