राज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा

राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा विरोधकांचा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. 

Updated: Dec 22, 2017, 06:52 PM IST
राज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा  title=

मुंबई : राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा विरोधकांचा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. 

याउलट राज्यातली गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला... यावेळी त्यांनी 'फाडफाड' आकडेवारीही वाचून दाखवली. कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. 

राज्यातील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे, गुन्हेगारीत महाराष्ट्राचा नंबर वर गेलाय, अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यावर खून, बलात्कार, दरोडे, दंगली अशा गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह सांगितलं.