रेल्वेचा मोठा निर्णय, तिकीट रद्द केल्यानंतर पैसे कधी मिळणार पाहा...

सध्या कोरोनाचा (Coronavirus) काळ आहे. त्यामुळे अनेक गाड्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, ज्या सुरु आहेत, त्यातील काही अचनाक रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचे ऑनलाई तिकीट आरक्षणाचे पैसे अडकून पडतात. (Online Railway Ticket Booking)  

Updated: Jun 21, 2021, 06:46 PM IST
रेल्वेचा मोठा निर्णय, तिकीट रद्द केल्यानंतर पैसे कधी मिळणार पाहा... title=

मुंबई : सध्या कोरोनाचा (Coronavirus) काळ आहे. त्यामुळे अनेक गाड्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, ज्या सुरु आहेत, त्यातील काही अचनाक रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांचे ऑनलाई तिकीट आरक्षणाचे पैसे अडकून पडतात. (Online Railway Ticket Booking) याबाबत अनेक प्रवाशांनी वेळोवेळी तक्रार केल्या आहेत. तसेच काही वेळा प्रवाशी आयत्यावेळी प्रवास टाळतात किंवा आरक्षण तिकीट रद्द करतात. मात्र, पैसे मिळण्यास उशिर होतो. बऱ्याच वेळा तीन ते पाच दिवस लागतात. यावर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. (IRCTC Rules Passanger may get full refund on cancellation of Train know process)

आता 48 ते 72 तास वाट पाहावी लागणार नाही...

भारतीय रेल्वेचे (Indian Railway) ऑनलाईन तिकीट आरक्षण (Online Ticket Booking) केले असेल आणि ते रद्द झाल्यास पैसे परत मिळण्यासाठी रेल्वे प्रवाशांना 48 ते 72 तास वाट पाहावी लागते. मात्र, हा प्रश्न आता तात्काळ सुटणार आहे. IRCTC ने रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना रिफंडचे पैसे लगेचच मिळू शकतात. त्यासाठी IRCTC IPay सुविधेचा वापर केला जाऊ शकतो. IRCTC पोर्टलवर ‘ऑटो पे’ आणि ‘आय-पे’, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे यूपीआय बँक खात्याच्या माध्यमातून पैसे तात्काळ मिळणास मदत होणार आहे.

Indian Railwayच्या या नव्या सुविधेमुळे बुकिंगचे पैसे तात्काळ  रिफंड मिळण्याचा कालावधी कमी होणार आहे. आणि वेटिंग लिस्टमध्ये असलेले प्रवाशी अनेकदा रिफंडसाठी लागणार वेळ बघता तिकीट लवकर रद्द करतात. मात्र, आता यूपीआय बँक खात्याच्या वापरामुळे प्रवाशाचे तिकीट कन्फर्म झाल्यानंतर पैसे कापले जातील.

अलिकडेच IRCTC कडून तिकीट बुकिंग वेगाने करण्यासाठी www.irctc.co.in हे संकेतस्थळ नव्याने अपग्रेड केले होते. त्यानंतर आता IRCTC-iPay हा पेमेंट गेटवे सुरु करण्यात आले आहे.

रेल्वेची कोरोना काळात, अशी खबरदारी

सध्या कोरोनाचा काळ आहे. कोविड नियमांचे पालन करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनवर स्क्रीनिंगवेळी शरीराचे तापमान जास्त असल्यास त्या प्रवाशांला प्रवास करता येणार नाही. त्याला घरी पाठविले जाणार आहे. तसेच त्याचे आरक्षणाचे पैसे परत केले जाणार आहे. सध्या रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवासासाठी सोशल डिस्टन्सिंगचे अनेक नियम आखून दिले आहेत. रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे स्क्रीनिंग केले जात आहे. त्यानंतर शरीराचे तापमान योग्य असेल तरच प्रवाशांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे.

अनफिट रेल्वे प्रवाशाला रेल्वेकडून तिकीटाचे पैसेही परत केले जात आहेत. त्यासाठी प्रवासाच्या दिवसापासून 10 दिवसांच्या आतमध्ये त्याला टीडीआर फाईल करावी लागेल. त्यानंतर टीटीई सर्टिफिकिटी सादर करुन प्रवाशी आपले पैसे परत मिळवू शकतात. तसेच रेल्वे स्थानकात गेल्यावर तुमच्यापैकी एकजण स्क्रीनिंगमध्ये अनिफट आढळला तर सर्व लोकांचे पैसेही रिफंड मिळू शकतात, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेय.