'मी ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचली नसती', Video Viral

सलमानने ऐश्वर्याला मारलं? खुद्द सलमानकडून मोठा खुलासा   

Updated: Jun 15, 2022, 02:10 PM IST
'मी ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचली नसती', Video Viral  title=

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चीत ब्रेकअप म्हणजे अभिनेता सलमान खान अभिनेत्री ऐश्वर्या राय.  आज देखील सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. आता दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे निघून गेले आहेत. पण आठवणी कधी विसरता येत नाहीत, हे मात्र खरं आहे. ब्रेकअपनंतर सलमान आपल्याला मारहाण करत असल्याचं वक्तव्य ऐश्वर्याने सांगितलं. आता सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओत एक महिला पत्रकार बॉलीवुड 'दबंग खान'ला ऐश्वर्या रायने केलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारते. तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर सलमान देतो. काही वेळापूर्वी प्रभु चावलाने हा प्रश्न मला विचारला तेव्हा मी टेबलवर हात मारला आणि टेबल तुटला. मी कोणाला मारतोय तर आमच्यात वाद सुरू आहे हे जाहीर आहे. जर मी तसं केलं असतं तर मला वाटत नाही ती जगली असती.

'सलमान मारहाण करायचा'
 1999 मध्ये 'हम दिल दे चुके सनम' सिनेमा दरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या जास्त जवळ आले. याच्या तीन वर्षांनंतर हे नातं तुटलं. सलमान खानचा आक्रमकपणा हे नातं तुटण्याला कारणीभूत होता. सलमानचं हिंसक वागणं हे आमच नात तुटण्यास कारणीभूत असल्याचे खुद्द ऐश्वर्या रायने सांगितलं.

सलमान माझ्यावर संशय घ्यायचा. 'माझे इतर स्टार्ससोबत अफेयर असल्याचं वायफळ बोलत राहायचा. काहीतरी भांडण काढून मारहाण करायचा.

सुदैवाने माझ्या शरीरवार कोणती जखम आली नाही. माझ्यासोबत काही झालंच नाही असं समजून मी शूटींगला जायची. स्वाभिमानी महिलेप्रमाणे मी हे नातं तोडलं.' असं तिने सांगितलं.