dengue

अजित पवारांनी डेंग्यूविषयी अधिकाऱ्यांना झापलं

शहरात डेंगूच्या थैमानानंतर अजित पवार यांनी आढावा बैठक घेत अधिका-यांना चांगलंच झापलं. डेंगू आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याची दादांनी तंबी दिलीय, त्याच बरोबर डेंगू बाबत जनजागृती वर भर देण्याची गरज अजित पवार यांनी या वेळी व्यक्त केली.

Nov 16, 2014, 09:58 PM IST

राज्यात डेंग्यू थैमान, गडचिरोलीत मलेरियानं गाठलं

राज्यात डेंग्यू प्रचंड प्रमाणात थैमान घालत असताना, गडचिरोलीमध्ये मलेरियानं लोकांचं जगणं मुश्कील केलंय. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ पसरलीय. 

Nov 14, 2014, 08:53 PM IST

डेंग्यू हा मीडियानं मोठा केलेला आजार, महापौरांची मुक्ताफळं

मुंबईमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापौर स्नेहल आंबेकरांना मात्र हा आजार मीडियानं मोठा केल्याचा भ्रम झालाय. त्यांनी आज राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हा डेंग्यू मीडियानं मोठा केलाय, त्यामुळं मी आज इथं भेट दिली, असं त्या म्हणाल्या. 

Nov 11, 2014, 05:07 PM IST

'केईएम'मधल्या नऊ डॉक्टरांना डेंग्युची लागण

'केईएम'मधल्या नऊ डॉक्टरांना डेंग्युची लागण

Nov 8, 2014, 08:07 PM IST

राज्यातील आरोग्य यंत्रणा निद्रीस्त, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास अपयश

अच्छे दिन हवे असतील तर आमच्या हातात सत्ता द्या, असा भाजपने निवडणुकीत नारा दिला होता. मात्र, आज राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीत स्थितीत दिसत आहे. ठोस पावले उचलली न गेल्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. भाजपचे सरकार राज्यात स्थापन होऊनही आठ दिवसानंतर पूर्णवेळ आरोग्यमंत्री नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी दहा मंत्र्यांना खाते वाटप केले. अजुनही अनेक खात्यांचे वाटप व्हायचे आहे. ही सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत.

Nov 8, 2014, 07:42 AM IST

माधवी माळी ठरल्या डेंग्युच्या अकराव्या बळी

माधवी माळी ठरल्या डेंग्युच्या अकराव्या बळी

Nov 7, 2014, 10:43 PM IST

डेंग्युच्या साथीमुळे पपईची मागणी वाढली

डेंग्युच्या साथीमुळे पपईची मागणी वाढली

Nov 7, 2014, 06:12 PM IST

डेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा

राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Nov 7, 2014, 07:48 AM IST

आर्थिक राजधानी सापडली डेंग्यूच्या विळख्यात

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आज डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहे.. दहा मृत्यू आणि 659 डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या मुंबईत डेग्यूनं हाहाकार माजवला आहे... डेंग्यूशी दोन हात करतांना प्रशासन यंत्रणा अपुरी पडतेय. इबोलाचा उद्रेक झाला तर काय अवस्था होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे..

Nov 6, 2014, 08:53 PM IST