937 deaths

देशात मुसळधार पावसामुळे ९३७ जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे झालेली मुंबईकरांची दैना उभ्या महाराष्ट्राने दोन दिवसांपूर्वीच पाहिली. पण, केवळ मुंबईच नव्हे तर, संपूर्ण देशात मुसळधार पावसाने थैमान घातल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे देशात तब्बल ९३७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आदी राज्यांमध्ये पाऊस तांडव करत आहे.

Aug 31, 2017, 04:45 PM IST